शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

...म्हणून दिल्लीच्या तुलनेत मुंबईत काेराेनावर बऱ्यापैकी नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 06:25 IST

CoronaVirus News: प्रशासनाच्या प्रयत्नांना यश : कार्यक्रमांना बंदी घालण्यासह नियमांचे काटेकाेर पालन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जगभरात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले असून, आता दिल्लीमध्येदेखील कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मात्र त्या तुलनेत मुंबईत बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले असून, याचे सारे श्रेय येथील महापालिका आणि सरकारला आहे. कारण उत्सव असो किंवा कार्यक्रम. या सर्वांवर बंदी घालण्यासह नियम अधिकाधिक कठोर केल्याने, चाचण्या वाढविल्याने आणि सुरक्षितता बाळगल्याने दिल्लीच्या तुलनेत मुंबई कोरोनावर चांगले नियंत्रण मिळवित असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी आणि छठपूजासारख्या महोत्सवांबाबत सातत्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोना काळात लॉकडाऊन कायम ठेवण्यात महाराष्ट्र सरकार ठाम राहिले. शाळा, मंदिर स्थळे, मॉल, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स आणि लोकल पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली नाही. त्याऐवजी लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. गणेशोत्सवावेळी मुंबईने संयम दाखविला.

सामुदायिक दिवाळी साजरा करण्यासही बंदी घातली गेली. दिल्ली सरकारनेही वेळोवेळी अनेक मार्गदर्शक सूचना दिल्या. मात्र त्याच वेळी, त्यांनी लॉकडाऊन विश्रांती आणली. बाजारपेठा खुल्या केल्या. दारूच्या दुकानांवरचे निर्बंध हटविले. परिणामी, कोरोना नियमांचा फज्जा उडाला. मुंबईत मात्र नियम पाळले गेले. मुंबईत लोकांना घरामध्येच राहण्यास सांगण्यात आले. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत, अशी बंधने घालण्यात आली. मास्क अनिवार्य करण्यात आले. नियम मोडणाऱ्यांना दंड आकारण्यात आला.

याचा सकारात्मक परिणामn कोरोनावाढीचा दर तसेच मृत्युदर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे आपण संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून, डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. n सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पाहा, अशा सूचना राज्याने महापालिकेला दिल्या आहेत. जनतेच्या खूप जास्त संपर्कात येणारे लोक, बस चालक-वाहक, सार्वजनिक व्यवस्थेतील कर्मचारी हे सुपर स्प्रेडर्स असू शकतील. त्यामुळे त्यांच्या चाचण्या लगेच करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुंबईत काेराेना बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्ली