शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

CoronaVirus: दुसऱ्या लाटेत ६० हजारांहून अधिक कोरोनाबळी! राज्यातील भयावह आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 09:54 IST

CoronaVirus deaths in Maharashtra: आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख १४ हजार १५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. यातील जवळपास अर्धे मृत्यू हे १५ फेब्रुवारीनंतरचे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चार महिन्यांत ६० हजारांहून अधिक कोरोनाबळींची नोंद झाली आहे. पहिल्या लाटेत २ लाख ४८ हजार ८०२ रुग्णांची नोंद झाली हाेती, तर ५१ हजार ३६० मृत्यू झाले.

आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख १४ हजार १५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. यातील जवळपास अर्धे मृत्यू हे १५ फेब्रुवारीनंतरचे आहेत. काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे मृत्यू झाले आहेत. देशभरात होणाऱ्या काेरोना मृत्यूंपैकी २० टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. एकंदरीत भारतामध्ये आजपर्यंत झालेल्या ३.४ लाख काेरोना मृत्यूंपैकी ३० टक्के राज्यातील आहेत. गेल्या वर्षभरापासून हे प्रमाण स्थिर असल्याचे दिसत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. मुंबईत मृतांचा आकडा १५,२१६ च्या जवळपास आहे, तर पुण्यात ते १५,५९३ पेक्षा जास्त आहे.

राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, यावेळेच्या लाटेत मृत्यूंचे प्रमाण अधिक असण्यामागे विविध कारणे आहेत. त्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळून आल्याची नोंद आहे. तसेच, ग्रामीण भागातही संसर्गाची तीव्रता अधिक होती, त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था अपुरी असल्याने मृत्यू ओढावल्याचे दिसून आले. ऑक्सिजनचा तुटवडा, खाटांची उपलब्धता नसणे, उशिरा निदान या सर्व कारणांमुळे मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे.दुसऱ्या लाटेत रुग्णालयांची गरज अधिक पहिल्या लाटेत अनेक रुग्ण घरी क्वारंटाइन होऊन बरे झालेले दिसून आले. मात्र, दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. विषाणूत बदल झाल्याने रुग्णांना अधिक धोका झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक चिंताजनक ठरली, अशी माहिती डॉ. केदार घोसाळकर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस