शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

राज्यातील चार जिल्ह्यांत ३ टक्क्यांहून अधिक मृत्युदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 07:05 IST

मागील दोन महिन्यांत राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले आहे. राज्याच्या आऱोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ३६ लाख ८२ हजार ४६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  देशपातळीवर कोरोना मृत्युदरांत गेल्या तीन महिन्यांत घट झाली आहे, हे प्रमाण १.५५ टक्क्यांहून १.४५ टक्के झाले आहे. सध्या मुंबईचा कोरोना मृत्युदर ३.८ टक्के आहे, राज्याचा मृत्युदर २.५५ टक्के आहे. मात्र अजूनही राज्याच्या चार जिल्ह्यांत कोरोना मृत्युदर हा ३ टक्क्यांहून अधिक असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.राष्ट्रीय पातळीवरील मृत्युदराचे विश्लेषण पाहता तीन महिन्यांत हे प्रमाण कमी झाले आहे. सध्या सर्वाधिक मृत्युदर गुजरातमध्ये असून तीव्र संक्रमण काळात हा मृत्युदर २.४४ टक्क्यांहून १.७४ टक्के झाला आहे.

६ ऑक्टोबर रोजी राज्याचा मृत्युदर २.६४ टक्के होता, आता ६ जानेवारी रोजी हा मृत्युदर २.५५ टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे, या कालावधीत पॉझिटिव्हीटी दरही २०.२४ टक्क्यांहून १४.८८ टक्के झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याच्या दरातही वाढ होऊन याचे प्रमाण ८०.४८ टक्क्यांहून ९४.७९ टक्के झाला आहे.राज्यात मुंबईचा मृत्युदर सर्वाधिक असून याचे प्रमाण ३.८ टक्के आहे. त्यानंतर परभणी ३.७ टक्के, सांगली ३.५ टक्के, रत्नागिरी ३.४ टक्के मृत्युदर असल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली आहे. 

याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, ज्या जिल्ह्यांमध्ये मृत्युदर अधिक आहे, त्या जिल्ह्यांचे साप्ताहिक स्वरूपात विश्लेषण करण्यात येत आहे. त्यामुळे यंत्रणांकडून मृत्युदर कमी करण्यासाठी लवकर निदान, उपचार करण्यात येत आहेत.

राज्यात कोरोना चाचण्यांत २३ टक्क्यांनी घटमागील दोन महिन्यांत राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले आहे. राज्याच्या आऱोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ३६ लाख ८२ हजार ४६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या काळात ४७ लाख ५५ हजार ८३१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या कालावधीत दैनंदिन कोरोना चाचण्यांमध्येही घट झाली असून हे प्रमाण ७९ हजारांवरून ६१ हजारांवर आल्याचे दिसून आले. राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने परिणामी चाचण्याही कमी झाल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या