शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

राज्यात १० कोटी टनांपेक्षा जास्त साखर उत्पादन

By admin | Updated: June 4, 2015 23:20 IST

साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये ९ कोटी २९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० कोटी ४ लाख ८० हजार मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे.

राजीव लोहकरे - अकलूजमहाराष्ट्रातील ९९ सहकारी व ७९ खासगी अशा १७८ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये ९ कोटी २९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० कोटी ४ लाख ८० हजार मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.२७ असून गतवर्षाच्या तुलनेत ०.१३ टक्के साखर उतारा कमी असल्याची माहिती राज्य साखर संघाचे अध्यक्ष खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये ३७ कारखान्यांनी २१२.५५ लाख मे. टन उसाचे गाळप करून २६.८५ लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा सरासरी १२.५६ इतका आहे. हा साखर उतारा महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आहे. या विभागातील सर्व कारखान्यांचा हंगाम संपला आहे. पुणे विभागातील सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ६० कारखान्यांनी ३८६.६७ लाख मे. टन उसाचे गाळप करून ४२.८० लाख मे. टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागातून सरासरी ११.0७ टक्के साखर उतारा मिळाला आहे. ६ कारखाने अद्याप गाळप करत आहेत.अहमदनगर विभागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात २३ कारखान्यांनी १३०.00 लाख मे. टन उसाचे गाळप करून १४.३८ लाख मे. टन साखरेचे उत्पादन मिळवले आहे. त्यांना सरासरी ११.0७ टक्के साखर उतारा मिळाला आहे. नांदेड विभागातील नांदेड, परभणी, हिंंगोली, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांनी ११६.0८ लाख मे. टन उसाचे गाळप करून १२.३९ लाख मे. टन साखरेचे उत्पादन मिळवले आहे. त्यांना सरासरी १०.३७ टक्के साखर उतारा मिळालेला आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील १ सहकारी व १ खासगी अशा २ साखर कारखान्यांनी ४.८६ लाख मे. टन उसाचे गाळप करून 0.५० लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. त्यांना सरासरी साखर उतारा १०.३१ टक्के मिळाला आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा व भंडारा जिल्ह्यांतील ४ खासगी साखर कारखान्यांनी ५.४६ लाख मे. टन उसाचे गाळप करून 0.५६ लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. त्यांना १०.२७ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला आहे.गत हंगामापेक्षा या हंगामामध्ये २५३.५० लाख मे. टन अतिरिक्त उसाचे गाळप होऊन २७.७० लाख मे. टन जास्तीची साखर उत्पादित झाली आहे.औरंगाबाद विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी ७४.२२ लाख मे. टन उसाचे गाळप करून ७.५२ लाख मे. टन साखरेचे उत्पादन मिळवले आहे. त्यांना सरासरी १०.१३ टक्के साखर उतारा मिळाला आहे.