शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १० कोटी टनांपेक्षा जास्त साखर उत्पादन

By admin | Updated: June 4, 2015 23:20 IST

साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये ९ कोटी २९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० कोटी ४ लाख ८० हजार मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे.

राजीव लोहकरे - अकलूजमहाराष्ट्रातील ९९ सहकारी व ७९ खासगी अशा १७८ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये ९ कोटी २९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० कोटी ४ लाख ८० हजार मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.२७ असून गतवर्षाच्या तुलनेत ०.१३ टक्के साखर उतारा कमी असल्याची माहिती राज्य साखर संघाचे अध्यक्ष खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये ३७ कारखान्यांनी २१२.५५ लाख मे. टन उसाचे गाळप करून २६.८५ लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा सरासरी १२.५६ इतका आहे. हा साखर उतारा महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आहे. या विभागातील सर्व कारखान्यांचा हंगाम संपला आहे. पुणे विभागातील सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ६० कारखान्यांनी ३८६.६७ लाख मे. टन उसाचे गाळप करून ४२.८० लाख मे. टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागातून सरासरी ११.0७ टक्के साखर उतारा मिळाला आहे. ६ कारखाने अद्याप गाळप करत आहेत.अहमदनगर विभागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात २३ कारखान्यांनी १३०.00 लाख मे. टन उसाचे गाळप करून १४.३८ लाख मे. टन साखरेचे उत्पादन मिळवले आहे. त्यांना सरासरी ११.0७ टक्के साखर उतारा मिळाला आहे. नांदेड विभागातील नांदेड, परभणी, हिंंगोली, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांनी ११६.0८ लाख मे. टन उसाचे गाळप करून १२.३९ लाख मे. टन साखरेचे उत्पादन मिळवले आहे. त्यांना सरासरी १०.३७ टक्के साखर उतारा मिळालेला आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील १ सहकारी व १ खासगी अशा २ साखर कारखान्यांनी ४.८६ लाख मे. टन उसाचे गाळप करून 0.५० लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. त्यांना सरासरी साखर उतारा १०.३१ टक्के मिळाला आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा व भंडारा जिल्ह्यांतील ४ खासगी साखर कारखान्यांनी ५.४६ लाख मे. टन उसाचे गाळप करून 0.५६ लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. त्यांना १०.२७ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला आहे.गत हंगामापेक्षा या हंगामामध्ये २५३.५० लाख मे. टन अतिरिक्त उसाचे गाळप होऊन २७.७० लाख मे. टन जास्तीची साखर उत्पादित झाली आहे.औरंगाबाद विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी ७४.२२ लाख मे. टन उसाचे गाळप करून ७.५२ लाख मे. टन साखरेचे उत्पादन मिळवले आहे. त्यांना सरासरी १०.१३ टक्के साखर उतारा मिळाला आहे.