शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

जस्टीन बिबरच्या शोमध्ये चोरट्यांची कमाई

By admin | Updated: May 14, 2017 01:35 IST

भारतात प्रथमच नेरुळ येथे जस्टीन बिबरच्या झालेल्या कार्यक्रमात १३ जणांचे मोबाइल लंपास झाले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भारतात प्रथमच नेरुळ येथे जस्टीन बिबरच्या झालेल्या कार्यक्रमात १३ जणांचे मोबाइल लंपास झाले आहेत. त्यांनी यासंबंधीची तक्रार नेरुळ पोलिसांकडे केली असून चोरीला गेलेले मोबाइल महागड्या कंपनीचे आहेत. यावरून बिबरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चोरट्यांनीही हात साफ करून घेतल्याचे दिसून येत आहे.सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेला जस्टीन बिबरच्या गाण्यांचा कार्यक्रम बुधवारी नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये झाला. या कार्यक्रमास देशभरातून सुमारे ३५ हजार बिबरचे चाहते उपस्थित राहिले होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बिबरच्या उपस्थितीनंतर त्याच्या गाण्यांच्या तालावर त्या ठिकाणी उपस्थित तरुण-तरुणी थिरकत होते. या वेळी बेधुंद होऊन ते आनंद घेत असतानाच, चोरट्यांनीही त्यांची, ‘हात की सफाई’ दाखवून दिली आहे. बिबरच्या चाहत्यांपैकी १३ जणांनी कार्यक्रमादरम्यान मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार नेरुळ पोलिसांकडे केली आहे. तर त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले. बिबर चाहत्यांच्या तक्रारींवरून त्या भव्य कार्यक्रमात चोरटेही घुसले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कार्यक्रमाचे तिकीट दर हे ५ हजार ते ७० हजार रुपयेपर्यंतचे होते. त्यामुळे जमलेला प्रेक्षकवर्ग हा श्रीमंत कुटुंबातीलच होता. त्या सर्वांकडे महागड्या कंपन्यांचेच मोबाइल फोन होते. त्यापैकी अनेकांना उत्साहाच्या भरात स्वत:चे मोबाइल सांभाळण्याचेही भान न राहिल्याने ते पडले असावेत, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, जर त्यांचे मोबाइल पडले असते, तर ज्यांना ते सापडले असतील त्यांनी ते पोलीस अथवा आयोजकांकडे परत करणे अपेक्षित होते. मात्र, सापडलेला मोबाइल परत केल्याचा एकही प्रकार नसल्याने चोरट्यांनीच हात साफ केल्याची दाट शक्यता आहे. बिबरच्या चाहत्यांपैकी १३ जणांनी कार्यक्रमादरम्यान मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार नेरुळ पोलिसांकडे केली आहे.