शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यात पावसाचे धुमशान

By admin | Updated: July 15, 2017 05:36 IST

प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेला पाऊस शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही धो...धो बरसला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक/पुणे : प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेला पाऊस शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही धो...धो बरसला. नाशिक जिल्ह्यात तर पावसाचे अक्षरश: धुमशान सुरू असून, गोदावरीला पूर आला आहे. मुंबईसह उपनगरांतही मुसळधार पाऊस झाला. लोणावळ्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे. दुबार पेरण्यांचे संकट दूर होण्याची आशा निर्माण झाल्याने बळीराजा सुखावला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून कोसळधार सुरू आहे. सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात १९३ मि.मी. एवढा झाला. त्या खालोखाल त्र्यंबकेश्वर येथे १२५, सुरगण्याला १११ व पेठला ८८ मिलीमीटर एवढा पाऊस झाला. चालू मोसमात गोदावरीला पहिल्यांदाच पूर आला. शुक्रवारी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले होते. >पश्चिम महाराष्ट्रात धरण क्षेत्रात जोर पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, पाटण, कोयना, नवजा या परिसरात धो...धो पाऊस पडत आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणात ४०.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. कासारी, कोदे, पाटगाव या धरणक्षेत्रात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. >गंगापूर धरण ६२ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर धरण पूर्णपणे भरल्याने विसर्ग सुरू झाला आहे. महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचवटीतील मोरे मळा परिसरातील एका नाल्यातून शाळकरी मुलगा वाहून गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे.>मराठवाडा : वडवणी ४०, सोयेगाव ३०, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, फुलंब्री, सेनगाव, सिल्लोड येथे प्रत्येकी २०, बीड, बिलोली, धर्माबाद, हिंगोली, नांदेड, पालम, परभणी, वैजापूर येथेही हलका पाऊस झाला. विदर्भ : चिखलदरा, चिखली येथे प्रत्येकी ३०, भंडारा, गोंदिया, कारंजा, खामगाव, तुमसर येथे प्रत्येकी २०, बुलडाणा, हिंगणघाट, देऊळगाव राजा, जळगाव, मलकापूर, रिसोड आणि वाशिम येथेही चांगल्या सरी पडल्या.>कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे पेडवेवाडी येथील संगीता प्रभाकर माळकर (४०) या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या. कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथे रेल्वे टॅ्रकवर माती कोसळल्याने, बिकानेर कोइमतुर गाडी कणकवली स्थानकात थांबविण्यात आली होती. >पुलाला पडले भगदाड नाशिक जिल्ह्यातील घोटी-सिन्नर मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने वाहतूक बंद केली आहे. २२ जुलैनंतर जोर आणखी वाढणारराज्यात २२ जुलैनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.