शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

राज्यात पावसाचे धुमशान

By admin | Updated: July 15, 2017 05:36 IST

प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेला पाऊस शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही धो...धो बरसला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक/पुणे : प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेला पाऊस शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही धो...धो बरसला. नाशिक जिल्ह्यात तर पावसाचे अक्षरश: धुमशान सुरू असून, गोदावरीला पूर आला आहे. मुंबईसह उपनगरांतही मुसळधार पाऊस झाला. लोणावळ्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे. दुबार पेरण्यांचे संकट दूर होण्याची आशा निर्माण झाल्याने बळीराजा सुखावला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून कोसळधार सुरू आहे. सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात १९३ मि.मी. एवढा झाला. त्या खालोखाल त्र्यंबकेश्वर येथे १२५, सुरगण्याला १११ व पेठला ८८ मिलीमीटर एवढा पाऊस झाला. चालू मोसमात गोदावरीला पहिल्यांदाच पूर आला. शुक्रवारी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले होते. >पश्चिम महाराष्ट्रात धरण क्षेत्रात जोर पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, पाटण, कोयना, नवजा या परिसरात धो...धो पाऊस पडत आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणात ४०.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. कासारी, कोदे, पाटगाव या धरणक्षेत्रात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. >गंगापूर धरण ६२ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर धरण पूर्णपणे भरल्याने विसर्ग सुरू झाला आहे. महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचवटीतील मोरे मळा परिसरातील एका नाल्यातून शाळकरी मुलगा वाहून गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे.>मराठवाडा : वडवणी ४०, सोयेगाव ३०, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, फुलंब्री, सेनगाव, सिल्लोड येथे प्रत्येकी २०, बीड, बिलोली, धर्माबाद, हिंगोली, नांदेड, पालम, परभणी, वैजापूर येथेही हलका पाऊस झाला. विदर्भ : चिखलदरा, चिखली येथे प्रत्येकी ३०, भंडारा, गोंदिया, कारंजा, खामगाव, तुमसर येथे प्रत्येकी २०, बुलडाणा, हिंगणघाट, देऊळगाव राजा, जळगाव, मलकापूर, रिसोड आणि वाशिम येथेही चांगल्या सरी पडल्या.>कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे पेडवेवाडी येथील संगीता प्रभाकर माळकर (४०) या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या. कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथे रेल्वे टॅ्रकवर माती कोसळल्याने, बिकानेर कोइमतुर गाडी कणकवली स्थानकात थांबविण्यात आली होती. >पुलाला पडले भगदाड नाशिक जिल्ह्यातील घोटी-सिन्नर मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने वाहतूक बंद केली आहे. २२ जुलैनंतर जोर आणखी वाढणारराज्यात २२ जुलैनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.