शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

राज्यात पावसाचे धुमशान

By admin | Updated: July 15, 2017 05:36 IST

प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेला पाऊस शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही धो...धो बरसला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक/पुणे : प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेला पाऊस शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही धो...धो बरसला. नाशिक जिल्ह्यात तर पावसाचे अक्षरश: धुमशान सुरू असून, गोदावरीला पूर आला आहे. मुंबईसह उपनगरांतही मुसळधार पाऊस झाला. लोणावळ्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे. दुबार पेरण्यांचे संकट दूर होण्याची आशा निर्माण झाल्याने बळीराजा सुखावला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून कोसळधार सुरू आहे. सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात १९३ मि.मी. एवढा झाला. त्या खालोखाल त्र्यंबकेश्वर येथे १२५, सुरगण्याला १११ व पेठला ८८ मिलीमीटर एवढा पाऊस झाला. चालू मोसमात गोदावरीला पहिल्यांदाच पूर आला. शुक्रवारी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले होते. >पश्चिम महाराष्ट्रात धरण क्षेत्रात जोर पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, पाटण, कोयना, नवजा या परिसरात धो...धो पाऊस पडत आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणात ४०.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. कासारी, कोदे, पाटगाव या धरणक्षेत्रात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. >गंगापूर धरण ६२ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर धरण पूर्णपणे भरल्याने विसर्ग सुरू झाला आहे. महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचवटीतील मोरे मळा परिसरातील एका नाल्यातून शाळकरी मुलगा वाहून गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे.>मराठवाडा : वडवणी ४०, सोयेगाव ३०, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, फुलंब्री, सेनगाव, सिल्लोड येथे प्रत्येकी २०, बीड, बिलोली, धर्माबाद, हिंगोली, नांदेड, पालम, परभणी, वैजापूर येथेही हलका पाऊस झाला. विदर्भ : चिखलदरा, चिखली येथे प्रत्येकी ३०, भंडारा, गोंदिया, कारंजा, खामगाव, तुमसर येथे प्रत्येकी २०, बुलडाणा, हिंगणघाट, देऊळगाव राजा, जळगाव, मलकापूर, रिसोड आणि वाशिम येथेही चांगल्या सरी पडल्या.>कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे पेडवेवाडी येथील संगीता प्रभाकर माळकर (४०) या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या. कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथे रेल्वे टॅ्रकवर माती कोसळल्याने, बिकानेर कोइमतुर गाडी कणकवली स्थानकात थांबविण्यात आली होती. >पुलाला पडले भगदाड नाशिक जिल्ह्यातील घोटी-सिन्नर मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने वाहतूक बंद केली आहे. २२ जुलैनंतर जोर आणखी वाढणारराज्यात २२ जुलैनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.