शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

अंधविश्वासू पर्यटकांकडून राणीबागेत अजगरावर पैशांचा पाऊस

By admin | Updated: May 14, 2017 01:32 IST

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणी संग्रहालयात पहायला मिळत आहे.

अक्षय चोरगे। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २१ व्या शतकात विज्ञान युगाचा बोलबाला असतानासुद्धा काही नागरिकांच्या मनात खोलवर रूजलेल्या अंधश्रद्धा मात्र अद्यापही कमी झाल्या नसल्याचे उदाहरण भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणी संग्रहालयात पहायला मिळत आहे. प्राणीसंग्रहालयातील अजगरावर दररोज येणाऱ्या पर्यटकांकडून पैसे फेकले जात असल्याचे पहायला मिळत आहे. काहीतरी शुभ वार्ता मिळेल, शुभ शकून होईल, अशी भोळी अंधश्रद्धा मनात ठेवून पर्यटक अजगरावर एक, दोन, पाच आणि दहा रूपयांची नाणी फेकत आहेत. फेकलेले नाणे जर अजगराच्या अंगावर पडले तर शुभवार्ता मिळणारच असा गैरसमज पर्यटकांनी करून घेतला आहे. केअर टेकर नसल्याने ही प्रथा रोखण्यात प्रशासनाला अपयश मिळत आहे. तर काही वेळा केअर टेकरची नजर चूकवून पर्यटक नाणी फेकतात. अशा अंधश्रद्धांना थांबविण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. असे प्राणीमित्रांनी नमूद केले. राणीच्या बागेत विविध प्राणी आहेत त्यामध्ये अजगर सुद्धा आहेत. अनेक प्राण्यांसाठी केअरटेकर नसल्यामुळे प्राणीमित्रांमध्ये संतापाचे वातावरण पहायला मिळत आहे. केअरटेकर नसल्यामुळेच पर्यटक अशा गोष्टी करत आहेत. प्रशासनाने सर्व पिंजऱ्यांची देखभाल करण्यासाठी केअर टेकर नेमावा. आणि अशा अंधश्रद्धा रोखण्यासाठी पुढाकार घेवून काम करावे, असे प्राणी मित्र संघटनांचे म्हणणे आहे.ते पैसे कोणाच्या घशात?गर्दीच्या दिवशी अजगराच्या पिंजऱ्यात पर्यटकाकडून टाकल्या जाणाऱ्या नाण्याचा हिशोब ठेवला जात नाही. ज्यावेळी पिंजऱ्याची सफाई केली जाते त्यावेळी ही रोकड काढली जाते मात्र ती उद्यान विभागाकडे जमा केली जात नाही. सफाई कर्मचारी ते पैसे घेत असावेत, असा कयास आहे, असे उद्यान विभागाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले. उद्यानात अजगरासाठी स्वतंत्र पिंजरा व गुहा असून त्याच्या देखभालीसाठी प्रशिक्षीत कर्मचारी तैनात असतो. मात्र काही वेळा पर्यटक त्याची नजर चूकवून अजगराच्या दिशेने पैसे फेकतात. परंतु गुहेमुळे ती नाणी अजगराला लागत नाहीत.- संजय त्रिपाठी (संचालक, वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणीसंग्रहालय)पालिका प्रशासनाने सेल्फी पॉर्इंट साठी पैसे खर्च केले, परंतु राणीबागेतील प्राण्यांसाठी असलेले पिंजरे अद्ययावत करणे, प्राण्यांसाठी केअरटेकर नेमने या गोष्टींना दुय्यम स्थान दिले आहे. प्रशासनाने प्राण्यांच्या देखभालीकडेसुद्धा लक्ष द्यावे.- सुनिश कुंजू, (सचिव, प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी)राणीबागेत केअर टेकर खूपच कमी आहेत. सापांसाठी, अजगरांसाठी सर्पोद्यानातून प्रशिक्षण घेतलेले केअरटेकर असावेत. केअर टेकर वाढवले तर नाणी टाकन्यासारख्या अंधश्रद्धा नक्कीच कमी होतील.- विजय अवसरे, निसर्गमित्रभारत सध्या मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतोय. तरिही भारतीयांच्या मनात खोलवर रूजलेल्या अंधश्रद्धांचा विनाश होत नाही. अजगरावर नाणी फेकण्यासाख्या प्रथा थांबविण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. - गोविंद काजरोळकर, अंनिस कार्यकर्ता