शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यातील पैसा पवारांच्या तिजोरीत

By admin | Updated: September 10, 2014 02:59 IST

आघाडी शासनाने सिंचन प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला. या सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तिजोरीत गेले,

श्रीगोंदा (जि.अहमदनगर) : आघाडी शासनाने सिंचन प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला. या सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तिजोरीत गेले, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला.भाजपाच्या शेतकरी मेळाव्यात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, छगन भुजबळ यांनी केवळ आरक्षणाचे राजकारण केले. आघाडी शासनाचे दिवस आता संपले आहेत. राज्यात वेगळा इतिहास घडविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आघाडी शासनाला पाच वर्षात करता आली नाहीत, एवढी कामे केंद्रातील मोदी सरकारने १०० दिवसांत केली. मात्र काँग्रेसवाल्यांनी आरोपाची ‘फडतुस’ पुस्तिका काढली. आरोप कसे करावेत याचे देखील ट्रेनिंग काँग्रेसवाल्यांना देण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.आघाडी शासनाच्या लंकेचे दहन करण्यासाठी बिभीषण महायुतीत सामील झाले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत अन्यायकारी, भ्रष्टाचारी शासन संपुष्टात येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांना उमेदवारी देण्याचे संकेतही त्यांनी दिले.(प्रतिनिधी)