शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मोदींची कृती गांधी विचारांशी विसंगत

By admin | Updated: October 13, 2014 01:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधीच्या समाधीचे दर्शन घेतले. परंतु केवळ डोके टेकवून काही होत नाही. बापूंचे विचार ते आत्मसात करू शकलेले नाहीत. मोदी यांची कृती गांधी विचारांशी

राहुल गांधी : पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोलयोगेश पांडे/गणेश खवस - रामटेक/बुलडाणापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधीच्या समाधीचे दर्शन घेतले. परंतु केवळ डोके टेकवून काही होत नाही. बापूंचे विचार ते आत्मसात करू शकलेले नाहीत. मोदी यांची कृती गांधी विचारांशी विसंगत आहे अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. रामटेक येथील काँग्रेसचे उमेदवार सुबोध मोहिते यांच्या प्रचारासाठी शहरातील नेहरू मैदान येथे आयोजित प्रचारसभेदरम्यान ते रविवारी बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर कडाडून टीका करत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा बनविण्याची घोषणा केली होती. परंतु त्यांचे कार्य मात्र पटेल यांच्या विचारांच्या विरुद्धच राहिले आहे. एखादी गोष्ट बोलणे किंवा स्मारक बनविणे खूप सोपे असते, परंतु प्रत्यक्षात गांधी, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महान व्यक्तींची विचारधारा आत्मसात करून त्यावर चालणे फार कठीण असते. काँग्रेस पक्ष हा विचारधारेला नमन करतो व त्याच मार्गावर चालतो. काँग्रेस व आमच्या विरोधकांमध्ये नेमका हाच फरक आहे असे राहुल गांधी म्हणाले.कुठलाही देश, राज्य किंवा प्रदेश हा सरकार नव्हे तर जनता बनवते. त्यामुळे जनतेच्या विकासाला जास्त महत्त्व द्यायला हवे. परंतु वर्तमान सरकारवर ठराविक उद्योगपतींचाच प्रभाव दिसून येतो. मूठभर उद्योगपतींसाठी नव्हे तर जनतेचा भारत घडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात तेथील काही नामवंत उद्योगपतींशी चर्चा केली आणि काही दिवसांतच देशात अनेक औषधांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ कशी झाली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसने गरीब जनतेसाठी राबविलेल्या मनरेगासारख्या योजनांचा बट्ट्याबोळ करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे असा आरोपदेखील त्यांनी केला. रामटेक येथील प्रचारसभेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक,राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, राष्ट्रीय सचिव बाला बच्चन हे प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांनी आभार मानले.पाकसंदर्भात मवाळ धोरण का?राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेसंदर्भातदेखील नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सत्ता आली तर चीन व पाकिस्तान भारताला घाबरतील अशी पावले उचलू असे आश्वासन जनतेला दिले होते. परंतु चीनच्या राष्ट्रपतींसोबत ते झोके घेत असताना चीनच्या जवानांनी देशात घुसखोरी केली होती. यावर चीनला जाब विचारण्यात का आला नाही. आतादेखील पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर गोळीबार करण्यात येत आहे. आता का सरकारने मवाळ भूमिका घेतली आहे. मुळात बोलणे सोपे असते, काम करणे अवघड असते असा टोला राहुल गांधी यांनी हाणला. १०० दिवसांत काळा पैसा परत आणू म्हणणाऱ्या भाजपने आतापर्यंत एक दमडीदेखील आणलेली नाही असेदेखील ते म्हणाले.रामटेकला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र करूराहुल गांधी यांनी रामटेक येथील निसर्गसौंदर्य व या परिसराला लाभलेल्या ऐतिहासिक वारशाचे कौतुक केले. राजस्थानसारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक येतात. निसर्गाचे वरदान लाभलेल्या रामटेक येथेदेखील असेच चित्र निर्माण झाले पाहिजे. त्यामुळे येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र तयार करण्यावर आमचा भर असेल. केवळ महाराष्ट्र किंवा भारत नाही तर जागतिक स्तरावर रामटेकची पर्यटनासंदर्भात वेगळी ओळख निर्माण होईल. शिवाय रामटेक येथे उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न करू. यामुळे तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्ता आल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळेल, शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा होईल तसेच जीवनदायी योजना आणखी प्रभावी करून गरीब जनतेला त्याचा जास्त लाभ देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.