शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या नव्हे तर पवारांच्या सभा घेणार का?

By admin | Updated: October 6, 2014 00:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांवर विरोधकांकडून होणारी टीका हास्यास्पद आहे. मोदी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या सभा घ्यायच्या नाही तर मग का पवारांच्या सभा

जावडेकरांची टीका: बाळासाहेब असते तर युती तुटली नसतीनागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांवर विरोधकांकडून होणारी टीका हास्यास्पद आहे. मोदी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या सभा घ्यायच्या नाही तर मग का पवारांच्या सभा घ्यायच्या का? अशी टीका भाजप नेते व केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच वन व पर्यावरण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे केली. भाजप संपूर्ण बहुमत घेऊन राज्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जावडेकर यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत वरील मत व्यक्त केले. मोदींच्या राज्यातील प्रचार सभांवर राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेसह इतरही काही पक्षांनी केलेल्या टीकेकडे जावडेकर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मोदींच्या सभांवर आक्षेप घेणे हे एखाद्या संघाला त्यांच्या कर्णधाराशिवाय खेळण्याची अट घालण्यासारखा प्रकार आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मोदी हे या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या सभा होणे स्वाभाविक आहे. भाजप मोदींच्या सभा घेणार नाही तर काय पवारांच्या सभा घेणार का, असा प्रतिसवाल जावडेकर यांनी यावेळी केला.भाजपकडे स्थानिक नेतृत्वाची वानवा असल्याने मोदींचा वापर केला जात असल्याची टीकाही त्यांनी फेटाळून लावली. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करणे हा धोरणाचा नव्हे तर डावपेचाचा भाग आहे. आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी एक विशिष्ट नाव पुढे केले नव्हते. आताच हा प्रश्न का विचारला जातो? भाजपकडे या पदासाठी अनेक सक्षम नेते आहेत. निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जावडेकर म्हणाले. देशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या पदरी अपयश आले. मात्र महाराष्ट्रात अशी स्थिती राहणार नाही. पोटनिवडणुका या स्थानिक प्रश्नांवर लढविल्या जातात तर सार्वत्रिक निवडणुका या राज्याच्या भविष्य ठरविणाऱ्या असतात. त्यामुळे महाराष्ट्रात आघाडी सरकारला कंटाळलेली जनता मोदींच्या नेतृत्वात भाजपवर विश्वास व्यक्त करेल व पक्षाला बहुमत मिळेल. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळतील. ‘राष्ट्र के साथ, महाराष्ट्र’ असे राज्यातील जनतेने मन तयार केले आहे, असे जावडेकर म्हणाले.संघाच्या दसरा कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्याचे त्यांनी समर्थन केले. दूरदर्शन हे स्वायत्त आहे. त्यांचा निर्णय ते स्वत: घेतात. सरकार त्यात हस्तक्षेप करीत नाही. संघाच्या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी होती ती फक्त उठवण्यात आली. दूरदर्शनच नव्हे तर इतर वाहिन्यांनीही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले. याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा विरोधकांचा प्रचार खोटा आहे. महाराष्ट्र गुजरातचा मोठा भाऊ आहे हे खुद्द मोदींनीच स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडे मुद्दे नसल्याने ते वाटेल तसे आरोप करीत आहे, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)