शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

हॅट्ट्रिकसाठी मोदींनी निवडले पुन्हा यवतमाळ; दहा वर्षांपूर्वी झालेल्या ‘चाय पे चर्चा’ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 07:52 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे.

- गजानन चोपडेलाेकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून २०१४ साली यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून लोकसभेची पहिली इनिंग सुरू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची हॅट्ट्रिक साधण्यासाठी पुन्हा यवतमाळची निवड केली. २०१९ मध्येही यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला त्यांनी संबोधित केले होते, हे विशेष. बुधवारी पुन्हा त्यांनी यवतमाळातूनच महिला आणि शेतकऱ्यांनाच केंद्रस्थानी ठेवत  विकासाची ‘गॅरंटी’ दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. राज्यातील सर्व जागा काबीज करण्याची रणनीती भाजपने आखली असून, पंतप्रधानांचा यवतमाळ दौरा याचाच एक भाग आहे. २००४ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना यवतमाळात त्यांची प्रचार सभा झाली होती. त्यानंतर दहा वर्षांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांनी २० मार्च २०१४ साली दाभडी या गावात ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सॅटेलाईटद्वारे २३ राज्यांतील शेतकऱ्यांशी एकाच वेळी संवाद साधला होता. याच निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. १६ फेब्रुवारी २०१९ रोजी लोकसभेचे रणशिंगही त्यांनी पांढरकवडा येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यातून फुंकले होते. त्यावेळीदेखील भाजपला मोठा विजय मिळाला आणि ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. मोदींसाठी यवतमाळ दौरा ‘लकी’ ठरला. 

यवतमाळ ‘लकी’लोकसभेची हॅट्ट्रिक साधण्याकरिता ‘विकासाची गॅरंटी’ देण्यासाठी मोदींनी यवतमाळचीच निवड केल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. पंतप्रधानांच्या भाषणाची सुरुवातही ‘गॅरंटी’ याच शब्दानेच झाली. चाय पे चर्चा झाली तेव्हा जनतेने ३०० जागांवर विजय मिळवून दिला. २०१९ मध्ये ३५० जागा दिल्या आणि आता हीच जनता ‘अब की बार ४०० पार’ केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी