शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

हॅट्ट्रिकसाठी मोदींनी निवडले पुन्हा यवतमाळ; दहा वर्षांपूर्वी झालेल्या ‘चाय पे चर्चा’ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 07:52 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे.

- गजानन चोपडेलाेकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून २०१४ साली यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून लोकसभेची पहिली इनिंग सुरू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची हॅट्ट्रिक साधण्यासाठी पुन्हा यवतमाळची निवड केली. २०१९ मध्येही यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला त्यांनी संबोधित केले होते, हे विशेष. बुधवारी पुन्हा त्यांनी यवतमाळातूनच महिला आणि शेतकऱ्यांनाच केंद्रस्थानी ठेवत  विकासाची ‘गॅरंटी’ दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. राज्यातील सर्व जागा काबीज करण्याची रणनीती भाजपने आखली असून, पंतप्रधानांचा यवतमाळ दौरा याचाच एक भाग आहे. २००४ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना यवतमाळात त्यांची प्रचार सभा झाली होती. त्यानंतर दहा वर्षांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांनी २० मार्च २०१४ साली दाभडी या गावात ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सॅटेलाईटद्वारे २३ राज्यांतील शेतकऱ्यांशी एकाच वेळी संवाद साधला होता. याच निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. १६ फेब्रुवारी २०१९ रोजी लोकसभेचे रणशिंगही त्यांनी पांढरकवडा येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यातून फुंकले होते. त्यावेळीदेखील भाजपला मोठा विजय मिळाला आणि ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. मोदींसाठी यवतमाळ दौरा ‘लकी’ ठरला. 

यवतमाळ ‘लकी’लोकसभेची हॅट्ट्रिक साधण्याकरिता ‘विकासाची गॅरंटी’ देण्यासाठी मोदींनी यवतमाळचीच निवड केल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. पंतप्रधानांच्या भाषणाची सुरुवातही ‘गॅरंटी’ याच शब्दानेच झाली. चाय पे चर्चा झाली तेव्हा जनतेने ३०० जागांवर विजय मिळवून दिला. २०१९ मध्ये ३५० जागा दिल्या आणि आता हीच जनता ‘अब की बार ४०० पार’ केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी