शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

प्रवास सुखाचा होवो! नितीन गडकरींचा मोठा निर्णय; महाराष्ट्राला होणार फायदाच फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 16:08 IST

रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी केंद्राचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानं राष्ट्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाच्या स्थापनेचा आदेश काढला आहे. रस्ते सुरक्षेबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि नवं तंत्रज्ञान अंगिकारण्याची जबाबदारी या बोर्डाकडे असेल. या बोर्डाचं मुख्यालय एनसीआरमध्ये असेल. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये बोर्डाची कार्यालयं असू शकतात. याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही.

देशात होणाऱ्या रस्ते अपघातांची संख्या मोठी आहे. त्यात दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. ते टाळण्यासाठी, रस्ते प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी रस्ते सुरक्षा बोर्डाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा आदेश केंद्र सरकारकडून काढण्यात आला आहे. या बोर्डात संचालक आणि तीन सदस्यांचा समावेश असेल. बोर्डातील सदस्यांची किमान संख्या सातपर्यंत असू शकते. या सगळ्यांची नेमणूक केंद्र सरकारकडून केली जाईल.

रस्ते सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, अपघातांचा तपास करण्याची जबाबदारी रस्ते सुरक्षा बोर्डाकडे असेल. केंद्र सरकार, राज्य सरकारं आणि स्थानिक यंत्रणांना रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाबद्दल तांत्रिक सल्ले आणि सहकार्य देण्याचं काम बोर्ड करेल. या बोर्डाचा देशाला मोठा फायदा होईल. महाराष्ट्र वेगानं शहरीकरण होणारं राज्य आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षा आणि वाहतूककोंडीचा प्रश्न जास्त गंभीर आहे. त्यामुळे या बोर्डाचा मोठा लाभ महाराष्ट्राला होईल. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा