शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

पंतप्रधान मोदी मला मान्य नाहीत - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: January 1, 2016 17:02 IST

मन की बातमधून जनतेशी संवाद साधणारे मोदी संसदेत महत्वांच्या विषयावर मौन सोडत नाही, ते देशात बोलत नाहीत, पण परदेशात भाषणे देतात, ही त्यांची अंतर्गत भूमिका मला मान्य नाही, असे सबनीस म्हणाले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - गोध्रा हत्याकांडामुळे नरेंद्र मोदी कलंकित झाले मात्र तेच मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गौतम बुद्ध, महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान सांगत जगातील दहशतवाद कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. संघातून आलेल्या  मोदींचं स्वागत करायला पाकिस्तान किंवा इस्लाम राष्ट्रे वेडी नाहीत, असे सांगत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मात्र आपण पंतप्रधानांचे समर्थक आहोत, नरेंद्र मोदींचे नव्हे असे स्पष्ट करत रेडिओच्या 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधणारे पण संसदेत मौन न सोडणारे, परदेशात भाषणं करणारे आणि देशातील माध्यमांसमोर काहीही न बोलणारे मोदी आपल्याला बिलकूल मान्य नाहीत, त्यांच्या या अंतर्गत भूमिकेवर मला आक्षेप आहे, असेही सबनीस म्हणाले. 
दहशतवाद्यांकडून धोका असतानाही शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी पाकमध्ये गेले, त्यांना तेथे काही झाले असते तर आपल्याला पाडगावकरांच्या आधी त्यांना श्रद्धांजली वहावी लागली असती, असे वक्तव्य पिंपरीतील कार्यक्रमादरम्यान केल्यामुळे चर्चेत आलेल्या सबनीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना  पुरस्कार वापसीपासून ते दुष्काळापर्यंत अनेक मुद्यावर आपली मतं परखडपणे मांडली. 
नरेंद्र मोदी ही एक व्यक्ती म्हणून मला मान्य नाही, पंतप्रधान म्हणूनही त्यांच्या अनेक भूमिकांना माझा विरोध आहे, पण त्याच भारताच्या पंतप्रधान मोदींच्या तोंडून परदेशात भारताचे बुद्ध, गांधी यांचा उल्लेखाने जगातील क्रौर्य, दहशतवाद दूर होत असेल, परदेशातील व्यक्ती त्यांचा स्वीकार करत असतील, तर मग आपण त्यांना विरोध का करायचा? आपले त्यांच्याशी मतभेद असू शकतात, त्यावरून आपण भांडूही शकतो, पण जर मोदींच्या तोंडून गांधी, बुद्ध येत असतील तर त्याचं  स्वागत केलं पाहिजे, अशी भूमिका सबनीस यांनी मांडली. 
देशातील वाढत्या असहिष्णूतेमुळे विविध साहित्यिक, लेखक आणि दिग्गजांनी केलेल्या पुरस्कार वापसीचेही सबनीस यांनी समर्थन केलं. कलबुर्गी यांची झालेली हत्या आणि बीफच्या मुद्यावरून दादरी येथे जमावाच्या मारहाणीत झालेल्या इखलाख या मुसलमानाचा मृत्यू, या दोन्ही अतिशय निंदनीय घटना आहेत, त्यामुळेच पुरस्कार वापसी झाली आणि मी त्या पुरस्कार वापसीचे समर्थन करतो, असं सबनीस म्हणाले. पुरस्कार वापसीचा निर्णय हा असा अचानक घेण्यात आला नव्हता. मात्र तो घेण्यापूर्वी त्यांनी सरकारशी संवाद साधून, आपल्या समस्या, आक्षेप सांगायला हवे होते. सरकारच्या असहिष्णुतेबद्दल भारताचीच जनता असलेल्या या दिग्गजांनी पुरस्कार परत केले ना? पण हे सरकारही त्यांचच आहे ना, मग निषेधाचा मार्ग म्हणून पुरस्कार वापसीसारखं मोठं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी संवाद का साधला नाही? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच या घटनेच्या निषेधार्थ आपणही पुरस्कार वापस केला असता, पण तत्पूर्वी सरकारशी संवाद साधलाच असता असे सांगत सबनीस यांनी सुसंवाद महत्वाचे असल्याचे आवर्जून नमूद केले. 
 
साहित्य संमेलन रिकाम टेकड्यांचा अड्डा हे वक्तव्य नेमाडेंनाच लखलाभ
साहित्य संमेलन रिकाम टेकड्यांचा अड्डा हे भालचंद्र नेमाडेंचे वक्तव्य मला बिलकूल पटत नाही, त्यांचे हे वक्तव्य त्यांनाच लखलाभ. वारीला दरवर्षी येणारे ८-१० लाख भाविक रिकामटेकडे नसतील तर मग त्यांच्याप्रमाणेच साहित्यावर श्रद्धा असणारे एकत्र येत असतील तर त्यांना रिकाम टेकडं का म्हणायच? अस विचारत मी किंवा संमेलानाला येणारी कोणतीच व्यक्ती रिकाम टेकडा नाही, असे स्पष्ट मत सबनीस यांनी मांडले. तसेच नेमाडे आमच्या मंचावर येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू असेही ते म्हणाले.