शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी मला मान्य नाहीत - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: January 1, 2016 17:02 IST

मन की बातमधून जनतेशी संवाद साधणारे मोदी संसदेत महत्वांच्या विषयावर मौन सोडत नाही, ते देशात बोलत नाहीत, पण परदेशात भाषणे देतात, ही त्यांची अंतर्गत भूमिका मला मान्य नाही, असे सबनीस म्हणाले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - गोध्रा हत्याकांडामुळे नरेंद्र मोदी कलंकित झाले मात्र तेच मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गौतम बुद्ध, महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान सांगत जगातील दहशतवाद कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. संघातून आलेल्या  मोदींचं स्वागत करायला पाकिस्तान किंवा इस्लाम राष्ट्रे वेडी नाहीत, असे सांगत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मात्र आपण पंतप्रधानांचे समर्थक आहोत, नरेंद्र मोदींचे नव्हे असे स्पष्ट करत रेडिओच्या 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधणारे पण संसदेत मौन न सोडणारे, परदेशात भाषणं करणारे आणि देशातील माध्यमांसमोर काहीही न बोलणारे मोदी आपल्याला बिलकूल मान्य नाहीत, त्यांच्या या अंतर्गत भूमिकेवर मला आक्षेप आहे, असेही सबनीस म्हणाले. 
दहशतवाद्यांकडून धोका असतानाही शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी पाकमध्ये गेले, त्यांना तेथे काही झाले असते तर आपल्याला पाडगावकरांच्या आधी त्यांना श्रद्धांजली वहावी लागली असती, असे वक्तव्य पिंपरीतील कार्यक्रमादरम्यान केल्यामुळे चर्चेत आलेल्या सबनीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना  पुरस्कार वापसीपासून ते दुष्काळापर्यंत अनेक मुद्यावर आपली मतं परखडपणे मांडली. 
नरेंद्र मोदी ही एक व्यक्ती म्हणून मला मान्य नाही, पंतप्रधान म्हणूनही त्यांच्या अनेक भूमिकांना माझा विरोध आहे, पण त्याच भारताच्या पंतप्रधान मोदींच्या तोंडून परदेशात भारताचे बुद्ध, गांधी यांचा उल्लेखाने जगातील क्रौर्य, दहशतवाद दूर होत असेल, परदेशातील व्यक्ती त्यांचा स्वीकार करत असतील, तर मग आपण त्यांना विरोध का करायचा? आपले त्यांच्याशी मतभेद असू शकतात, त्यावरून आपण भांडूही शकतो, पण जर मोदींच्या तोंडून गांधी, बुद्ध येत असतील तर त्याचं  स्वागत केलं पाहिजे, अशी भूमिका सबनीस यांनी मांडली. 
देशातील वाढत्या असहिष्णूतेमुळे विविध साहित्यिक, लेखक आणि दिग्गजांनी केलेल्या पुरस्कार वापसीचेही सबनीस यांनी समर्थन केलं. कलबुर्गी यांची झालेली हत्या आणि बीफच्या मुद्यावरून दादरी येथे जमावाच्या मारहाणीत झालेल्या इखलाख या मुसलमानाचा मृत्यू, या दोन्ही अतिशय निंदनीय घटना आहेत, त्यामुळेच पुरस्कार वापसी झाली आणि मी त्या पुरस्कार वापसीचे समर्थन करतो, असं सबनीस म्हणाले. पुरस्कार वापसीचा निर्णय हा असा अचानक घेण्यात आला नव्हता. मात्र तो घेण्यापूर्वी त्यांनी सरकारशी संवाद साधून, आपल्या समस्या, आक्षेप सांगायला हवे होते. सरकारच्या असहिष्णुतेबद्दल भारताचीच जनता असलेल्या या दिग्गजांनी पुरस्कार परत केले ना? पण हे सरकारही त्यांचच आहे ना, मग निषेधाचा मार्ग म्हणून पुरस्कार वापसीसारखं मोठं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी संवाद का साधला नाही? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच या घटनेच्या निषेधार्थ आपणही पुरस्कार वापस केला असता, पण तत्पूर्वी सरकारशी संवाद साधलाच असता असे सांगत सबनीस यांनी सुसंवाद महत्वाचे असल्याचे आवर्जून नमूद केले. 
 
साहित्य संमेलन रिकाम टेकड्यांचा अड्डा हे वक्तव्य नेमाडेंनाच लखलाभ
साहित्य संमेलन रिकाम टेकड्यांचा अड्डा हे भालचंद्र नेमाडेंचे वक्तव्य मला बिलकूल पटत नाही, त्यांचे हे वक्तव्य त्यांनाच लखलाभ. वारीला दरवर्षी येणारे ८-१० लाख भाविक रिकामटेकडे नसतील तर मग त्यांच्याप्रमाणेच साहित्यावर श्रद्धा असणारे एकत्र येत असतील तर त्यांना रिकाम टेकडं का म्हणायच? अस विचारत मी किंवा संमेलानाला येणारी कोणतीच व्यक्ती रिकाम टेकडा नाही, असे स्पष्ट मत सबनीस यांनी मांडले. तसेच नेमाडे आमच्या मंचावर येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू असेही ते म्हणाले.