शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

‘कॉमन मॅन’ला भावले मोदी

By admin | Updated: August 22, 2014 01:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपुरातील पहिल्या भाषणातून शहरवासीयांना अनेक आशा-अपेक्षा होत्या. मोदी यांच्या भाषणानंतर त्या पूर्ण झाल्या की निराशा हाती आली, या विषयी अनेकांना बोलते केले.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपुरातील पहिल्या भाषणातून शहरवासीयांना अनेक आशा-अपेक्षा होत्या. मोदी यांच्या भाषणानंतर त्या पूर्ण झाल्या की निराशा हाती आली, या विषयी अनेकांना बोलते केले. त्यावेळी काहींनी मोदींनी भाषणातून सामान्यांना जिंकले तर काहींनी स्वतंत्र विदर्भावर बोलायला हवे होते, अशा प्रतिक्रिया दिल्या. देशाची काळजी जाणवलीपंतप्रधान मोदी यांच्या भाषणातून देशाची काळजी जाणवली. सामान्य माणसाला हेच अपेक्षित आहे. त्यांनी नष्ट होत चाललेली शेती, भ्रष्टाचार, बेरोजगारीवर बोट ठेवले.-फिरोज अन्सारी बेरोजगारांना दाखविले आशेचे किरणमोदीजींनी आपल्या भाषणात विकासाला महत्त्व दिले. सोबतच त्यांनी कमी शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना आशेचा किरणही दाखविला. स्वत:च्या कलागुणांच्या जोरावर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे शक्य आहे, असा सकारात्मक संदेश दिला.-मोहम्मद जकीमहागाईवर बोलायला हवे होतेमोंदीजींचे भाषण ऐकण्यासाठी फार उत्सुक होतो. परंतु आज त्यांचे भाषण नेहमीप्रमाणे झालेले नाही. त्यांनी देशातील वाढत्या महागाईवर बोलायला हवे होते. -दिगंबर जोशीभाषणात एकसूरपणा होतापंतप्रधानाचे आजचे भाषण रटाळ होते. नेहमीचा एकसूरपणा होता. त्यामुळे अनेक लोक त्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर दहा मिनिटात बाहेर पडायला लागले.-संजय कटरेविदर्भावर बोलायला हवे होतेआजच्या घडीला संपूर्ण विदर्भ वेगळ्या विदर्भाच्या प्रतीक्षेत आहे. या धर्तीवर त्यांनी आपल्या भाषणात विदर्भाविषयीचे मत मांडायला हवे होते. विदर्भवाद्यांची घोर निराशा झाली.-उमेश नारनवरेभ्रष्टाचाराचा मुद्दा उचललादेश भ्रष्टाचाराने पोखरून निघाला आहे. मोदीजींनी आपल्या भाषणात हा मुद्दा उपस्थित करून उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, या विषयी मी सामान्य लोकांसोबत आहे. त्यामुळे ज्यांना स्वत:ला बदलायचे आहे त्यांनी बदलावे, असा इशाराही दिला.- जय चव्हाणओजस्वी भाषण नव्हतेपंतप्रधानांचे भाषण ओजस्वी असेच असावे. परंतु आजच्या भाषणात अनेक उणिवा होत्या. त्यांना येथील समस्या माहीत नसल्याचे दिसून आले. त्यांनी महागाई व बेरोजगारीवर बोलायला हवे होते. -रेणुका चव्हाणविकासावर भरभरून बोललेविकासावर मोदीजी भरभरून बोलले. त्यांच्या भाषणात देशातील ५०० शहरांचा विकासापासून ते कृषीचा विकास हाच उद्देश असल्याचे दिसून आले. भ्रष्टाचारावरही सडकून टीका केली.- सचिन रानडेमोठा दिलासा मिळाला‘पिछले साठ साल मे जिसको मौका मिला उसने धोका दिया’ हे त्यांच्या भाषणातील वाक्य बरेच काही सांगून गेले. एक मोठा दिलासा सामान्य माणसाला मिळाला.-श्रुती खोब्रागडेविदर्भाची घोषणा हवी होतीमोंदींनी आपल्या भाषणात स्वतंत्र विदर्भाची घोषणा करायला हवी होती. त्यांच्या पक्षाचीही हीच मागणी आहे. -सुनील जवादे