शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घोकंपट्टीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Updated: June 16, 2017 00:23 IST

दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी १००पैकी १०० गुण मिळवल्याने राज्याच्या शिक्षणपद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे. ती योग्यच आहे. पण, नीट आणि जेईई परीक्षांचा निकाल

- लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी १००पैकी १०० गुण मिळवल्याने राज्याच्या शिक्षणपद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे. ती योग्यच आहे. पण, नीट आणि जेईई परीक्षांचा निकाल चांगला लागायला हवा असेल; तर सध्याचा घोकंपट्टीचा अभ्यासक्रम बदलणे अपेक्षित आहे. त्यासाठी दहावी व बारावीचा परीक्षा पॅटर्न बदलावा लागेल. तो बदलण्यापूर्वी अभ्यासक्रम बदलायला हवा. शिक्षणतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार तो २०१९मध्ये बदलला जाईल, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि राज्यात शाळेच्या पहिल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या प्रवेशोत्सवानिमित्त ते बोलत होते. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेत गुरुवारी आयोजित शैक्षणिक कार्यक्रमात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाददेखील साधला. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, महापौर राजेंद्र देवळेकर, शिक्षण सभापती वैजयंती घोलप, के.सी. गांधी विद्यालयाचे अध्यक्ष अशोक प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते. नीट आणि जेईईच्या परीक्षांबाबत सरकारने न्यायालयात आपली बाजू योग्य प्रकारे मांडली होती, असे सांगून तावडे म्हणाले, शैक्षणिक बदल हा विजेचे बटण दाबावे, तसा होत नाही. दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी आधी नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलावा लागेल. ही प्रक्रिया २०१८मध्ये होईल. त्यानंतर, २०१९मध्ये दहावी व बारावीचा अभ्यासक्रम बदलता येईल.