शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनकारच निघाला मोबाईल चोर

By admin | Updated: October 20, 2016 20:21 IST

कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकाराचा चक्क पाकीट आणि मोबाईल चोरीत सहभाग उघड झाला आहे

प्रकाश लामणे

पुसद (यवतमाळ), दि. २० - कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकाराचा चक्क पाकीट आणि मोबाईल चोरीत सहभाग उघड झाला आहे. त्याने सुमारे सव्वालाख रुपये किंमतीचे १३ मोबाईल आतापर्यंत चोरी केल्याची कबुली पुसद पोलिसांना दिली आहे.

साहील संजय भोजले (१९) रा. सवना ता. महागाव जि. यवतमाळ असे या कीर्तनकाराचे नाव आहे. साहील महाराज (सवनेकर) म्हणून तो प्रसिद्ध आहे. पुसद शहरालगतच्या श्रीरामपूर येथील एका घरातून पॉकीट चोरण्याच्या प्रयत्नात असताना पुसद पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आतापर्यंत विविध ठिकाणावरुन एक लाख २२ हजार १०० रूपये किंमतीचे तब्बल १३ मोबाईल हॅन्डसेट चोरल्याची कबुली दिली. त्याच्या या कबुलीने पुसद पोलीस चांगलेच चक्रावले. या महाराजांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश ददिले. त्यानंतर पोलिसांकडून सध्या या महाराजाची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात यवतमाळला करण्यात आली आहे. ही कारवाई प्रभारी ठाणेदार धीरज चव्हाण, दीपक ताटे, नंदू चौधरी, भगवान डोईफोडे, रवींद्र गावंडे यांनी पार पाडली.महाराज चक्क यु-ट्यूबवर यवतमाळ जिल्ह्यात प्रख्यात कीर्तनकार म्हणून ओळख निर्माण केलेल्या परंतु आता पाकीट व मोबाईल चोरीत सापडलेल्या साहिल महाराज भोजले याचे कीर्तन चक्क यू-ट्युबवरसुद्धा उपलब्ध आहे. अशा या आॅनलाईन महाराजांची ही ह्यअनोखी कामगिरीह्ण पोलिसांसह सर्वांनाच अचंबित करणारी ठरली आहे. पुसद विभागातील सलग दुसरा महाराजकीर्तनकाराचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग आढळण्याचा पुसद विभागातील हा सलग दुसरा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. काही महिन्यांपूर्वी यवतमाळातील दारव्हा रोड स्थित सतीश फाटक यांच्याकडे पडलेल्या दरोड्यातही पुसद तालुक्यातील एका महाराजाच्या टोळीचा सहभाग आढळून आला होता. सदर महाराज या टोळीचा म्होरक्या निघाला. तो फरार आहे. उत्तर प्रदेशात त्याने आश्रय घेतला असावा, असा पोलिसांना संशय आहे. धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक योगदान देणारा, सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारा आणि विविध निवडणुकांमध्ये सतत पुढाकार घेणारा हा महाराज चक्क दरोडेखोरांच्या टोळीचा सूत्रधार निघाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. त्याची चर्चा आणि शोध सुरू असताना पुसद विभागात आणखी एका कीर्तनकाराचे गुन्हेगारी कृत्य पुढे आल्याने नागरिकांनी आता कुणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.