शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

बापरे! युवकाच्या खिशातच मोबाईलनं घेतला अचानक पेट; भंडाऱ्यातील अजब प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 09:40 IST

अंकित भुते असं या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. या दुर्घटनेत अंकित किरकोळ जखमी आहे.

भंडारा - सध्याच्या युगात प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. परंतु हाच मोबाईल तुमच्या जीवावर बेतू शकतो हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना. कारण भंडाऱ्यात घडलेल्या एका दुर्घटनेत तरुणाचा जीव वाचला आहे. पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईल अचानक पेट घेतल्यानं युवक जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सौंदळ पुनर्वसन येथील ही घटना आहे. 

अंकित भुते असं या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. या दुर्घटनेत अंकित किरकोळ जखमी आहे. नेहमीप्रमाणे सकाळी घरातून निघताना अंकितनं मोबाईल खिशात ठेवला होता. गावातील सांस्कृतिक कार्यक्रमात असताना अचानक अंकितला काहीतरी जळण्याचा भास झाला. त्याने खिशात हात घालून पेटलेला मोबाईल बाहेर फेकून दिला. मात्र या घटनेत अंकितच्या मांडीला मोठी जखम झाली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी तात्काळ अंकितला हॉस्पिटलला नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. 

या दुर्घटनेत अंकितच्या पायाचा काही भाग जळाला. त्याला उपचार करून घरी पाठवण्यात आले. याबाबत अंकित म्हणाला की, मी मोबाईल घेऊन जवळपास १४-१५ महिने झाले आहेत. आतापर्यंत काही समस्या जाणवली नाही. विवो कंपनीचा हा मोबाईल आहे. मी ओव्हर चार्जिंगही केली नव्हती असं त्याने म्हटलं. 

...नाहीतर मोबाइलचा स्फोट होऊ शकतोथर्ड पार्टी चार्जरः बर्‍याचदा लोक थर्ड पार्टी चार्जर वापरतात, जे मोबाईलला आग लागण्याचे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होतो. थर्ड पार्टी चार्जरमध्ये बरेच पार्ट नसतात, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत फोनचे हार्डवेअर खराब होऊ शकते किंवा चार्जिंग दरम्यान, त्याचे तापमान वाढू शकतं. यामुळेच स्मार्टफोनचा स्फोट होण्याची दाट शक्यता असते. 

ओव्हर हिटिंगपासून बचाव: स्मार्टफोन अनेकदा गरम होतात आणि चार्जिंग दरम्यान ही समस्या मोठं रूप धारण करू शकते. अशा परिस्थितीत फोनचे तापमान नियंत्रणात ठेवलं पाहिजे हे लक्षात ठेवा. यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनचे कुलिंग पॅड देखील वापरू शकता.

फोनला जास्तवेळ सूर्यप्रकार ठेवू नका: स्मार्टफोनला तासनतास थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. अशा स्थितीत स्मार्टफोनचे तापमान वेगाने वाढू शकते आणि त्याची बॅटरी फुटू शकते.

मॅन्युफॅक्टरिंग फॉल्ट: अनेक वेळा कंपनीच्या चुकीमुळे स्मार्टफोनला आग लागते आणि त्याची बॅटरी फुटते. अलीकडे वनप्लस फोनला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

यूझर्सची चूक: अनेकदा यूझर्सच्या चुकीच्या वापरामुळे स्मार्टफोन पेटतो. अशा परिस्थितीत वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे आणि ही सर्व संभाव्य कारणे आहेत. 

टॅग्स :Mobileमोबाइल