शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

मोबाईलचे व्यसन होतेय जीवघेणे

By admin | Updated: July 8, 2017 01:48 IST

आठ वर्षांचा यश एक तासापासून यू ट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात मग्न झाला होता... हातातली कामे उरकल्यावर आईचे लक्ष गेले आणि तिने हटकले.

प्रज्ञा केळकर-सिंग/लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आठ वर्षांचा यश एक तासापासून यू ट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात मग्न झाला होता... हातातली कामे उरकल्यावर आईचे लक्ष गेले आणि तिने हटकले... काही वेळाने ‘यश, आता मोबाईल ठेव हं,’ असा धमकीवजा इशाराही दिला...‘थांब गं आई,’ असे म्हणून तो पुन्हा मोबाईलमध्ये रमला... आता मात्र आईचा पारा चढला आणि तिने यशच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. यश प्रचंड संतापला, त्याने वस्तू फेकून आदळ-आपट करायला सुरुवात केली आणि ‘माझ्या मनासारखे होत नसेल, तर मला जगायचेच नाही’ असे म्हणत आपल्या खोलीत जाऊन त्याने धाडकन दार लावून घेतले. आपल्या चिमुरड्याचे विचित्र वागणे पाहून आई भांबावून गेली. आई-वडिलांनी मोबाईल हातातून काढून घेतल्याने नऊ वर्षांच्या मुलाने स्वत:चा हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच हरियाणामध्ये घडली. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला लाड म्हणून दिल्यानंतर मुलांना मोबाईलचे व्यसन लागल्याची तक्रार पालकांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आजकाल घराघरांत असे चित्र सर्रास पहायला मिळत आहे. दोन वर्षांच्या मुलापासून प्रत्येकाला मोबाईलचे अक्षरश: वेड लागले आहे. सतत मोबाईल हाताळण्याची सवय लागल्याने पालकांनी मोबाईल हिसकावून घेतला, तर ती गोष्ट मुलांना सहन होत नाही. मनासारखे होत नसल्याने पालकांना आत्महत्येची धमकी देण्याची मानसिकता मुलांमध्ये बळावत आहे. या परिस्थितीला मोठ्या प्रमाणात आई-वडीलच जबाबदार असून, त्यांनीच मुलांना या सवयीपासून परावृत्त करणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना डॉ. उदय ठकार म्हणाले, ‘‘गेल्या काही काळामध्ये चौकोनी अथवा त्रिकोणी कुटुंबाची संकल्पना उदयाला आली आहे. आई-वडील नोकरी करणारे असल्याने त्यांना मुलांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. मुलांसाठी भरपूर खर्च करून, त्यांचे हट्ट पुरवून पालक भरपाई करण्याचा प्रयत्न करतात. हातातील कामे आटोपता यावीत आणि तोवर मुलाने शांत बसावे, म्हणून आई लहान मुलाच्या हातात मोबाईल सोपवते. हळूहळू मुलांना मोबाईलची सवय लागते. मोबाईल हातात असल्याशिवाय मुलगा जेवत नाही, अशी तक्रार पालकांकडून केली जाते तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आपणच मुलांना ही सवय लावल्याचे पालक सोयीस्करपणे विसरतात. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर जागे होतात. मुलांना मोबाईलपासून परावृत्त करणे, नात्यांचे महत्त्व पटवून देणे, मैदानी खेळांची सवय लावणे या सवयी पालकच मुलांना लावू शकतात.’’पालकांनी मोबाईल हातातून काढून घेतला, की मुलांमध्ये राग आणि तणावाची लक्षणे दिसू लागतात. मुले भयंकर चिडतात आणि विचित्र वागू लागतात. आई-बाबा आपले सर्व हट्ट पुरवतात, हे माहीत असल्याने मुले ‘इमोशनल ब्लॅकमेल’ ककू लागतात. ‘मी जेवणार नाही, बोलणार नाही’ इथपासून घरातून ‘निघून जाईन, आत्महत्या करेन’अशी धमकी देतात. अशा वेळी पालकांनी हतबल होण्यापेक्षा निग्रहाने मुलाच्या सवयींमध्ये बदल करणे, त्याला सामाजिक बांधिलकी शिकवणे, शेजारी, नातेवाईक यांच्याशी संवाद साधण्यास शिकवणे आदी उपाय अवलंबणे आवश्यक असल्याचे मतही डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.लहान मुलांमधील मोबाईलचे व्यसन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोणतेही मूल मोबाईलचे वेड घेऊन जन्माला येत नाही. पालक त्याला या साधनाची ओळख करून देतात. मुलांनी टेक्नोसॅव्ही असले पाहिजे, असा विनाकारण बागुलबुवा केला जातो. मोबाईलशिवाय आपले काहीही अडत नाही, याची आधी पालकांना जाणीव होणे आवश्यक आहे. मुले पालकांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे मोबाईल वापराबाबत पालकांनी तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. मुले मोबाईलच्या आहारी गेली असतील, तर निग्रहाने त्यांना परावृत्त करायला हवे. मुलांच्या व्यक्तिमत्त्व-विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. - डॉ. भूषण शुक्ला, बालमानसरोगतज्ज्ञ