शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डम्पिंग बंद झाले पण त्यामागील भावना किती शुद्ध?; आमदार राजू पाटील यांचा सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:14 IST

कल्याण पश्चिम येथील आधारवाडी डम्पिंग नुकतेच बंद झाले आहेत. मात्र कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबत एक धक्कादायक आरोप केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  

डोंबिवली:कल्याण पश्चिम येथील आधारवाडी  डम्पिंग नुकतेच बंद झाले आहेत. मात्र कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबत एक धक्कादायक आरोप केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने रिंगरोड आणि इतर प्रकल्पांसाठी डम्पिंग ग्राऊंड बंद केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. डम्पिंग बंद केल्याबाबत केडीएमसीचे अभिनंदन करत त्यामागील भावना किती शुद्ध आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पालिकेच्या डोंबिवली येथील विभागीय कार्यालयात आमदार पाटील आणि केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन कल्याण ग्रामीणमधील लसीकरण, 27 गावांतील कर्मचारी, डम्पिंग आदी विषयांवर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील विधान केलं.        डम्पिंगबाबतचे केडीएमसीचे धोरण म्हणजे एकीकडे खड्डा करणे आणि दुसरीकडे भरणी काहीसे असेच आहे. बारावे येथील प्रकल्पाचाही स्थानिकांना त्रास होत असून पालिकेने कुठे तरी एक सुनियोजित प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचेही  पाटील यावेळी म्हणाले. कोपर पुलाचे पायाभूत काम संथगतीने सुरू असून अद्याप याठिकाणी असणाऱ्या वीज वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मर अद्याप शिफ्ट झाल्या नाहीत. कोपर पुलाच्या केवळ तारखा पडत आहेत. यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नसून तो पूल जेव्हा व्हायचा तेव्हाच होईल असा टोलाही त्यांनी यावेळी प्रशासनाला लगावला. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाRaju Patilराजू पाटीलMNSमनसेkalyanकल्याण