सुविधांपासून कल्याण-डोंबिवलीकर वंचितडोंबिवली : महापालिकेच्या असंख्य महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम कूर्मगतीने सुरू आहे. तसेच महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांना उधाण आल्याने शहरांना बकाल स्वरूप आले आहे. या समस्या सोडविण्यासाठी आयएएस दर्जाच्या आयुक्तांची पालिकेला नितांत आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आयुक्तांसमवेत सक्षम अशा शहर अभियंत्याचीही आवश्यकता आहे. यासह अन्य समस्यांचे गार्हाणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी डोंबिवलीतील मनसेचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.कल्याण-डोंबिवली पालिकेतील करदात्यांना राज्यात सर्वाधिक कराचा भरणा करावा लागतो. त्या तुलनेत करदात्यांना अतिशय सुमार दर्जाच्या सुविधा मिळतात. सत्ताधारी युतीचे विशेषत: शिवसेनेचे हे अपयश ठळकपणे समाजासमोर आणण्याची गरज आहे. अशा काही निवडक मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने तोडगा काढावा आणि येथील लाखो नागरिकांना सुख-सुविधांपासून वंचित ठेवू नये, असेही पक्षातील सूत्रांनी सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद (राजू) पाटील यांच्यासह येथील पक्षाचे २७ नगरसेवकांपैकी काही निवडक नगरसेवकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले.
मनसेचे डोंबिवलीतील शिष्टमंडळ भेटणार मुख्यमंत्र्यांना!
By admin | Updated: June 4, 2014 23:03 IST