शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मनसेचे ‘इंजिन’ लागले धक्क्याला!

By admin | Updated: November 3, 2015 02:34 IST

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीत दारुण पराभव करून, मतदारांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात, मनसेचे इंजिन जणू कायमचे धक्क्याला लावले.

- गौरीशंकर घाळे (विश्लेषण)लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीत दारुण पराभव करून, मतदारांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात, मनसेचे इंजिन जणू कायमचे धक्क्याला लावले.कल्याण-डोंबिवलीत मागील निवडणुकीत मनसेला २७ जागांवर विजय मिळाला होता. या वेळी केवळ ९ जागाच मनसेला राखता आल्या. प्रभागरचना बदलल्याने फटका बसला, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. मात्र, २७ नगरसेवकांचे काम इतके मर्यादित होते की, फेररचनेनंतर त्यांच्या तोंडाला अक्षरश: फेस आला. शिवाय, कुंभमेळ्याच्या निमित्ताने शासनाने नाशकात केलेल्या कामाची टेप त्यांनी स्वत:च्या नावाने जोरदार वाजविली, पण मतदारांनी त्यांचा हा बनाव पुरता उघडा पाडला. फक्त भाषणबाजीवर निवडणुका जिंकता येत नाहीत. पक्ष नेतृत्वाची विश्वासार्हता संपली की नेमके काय होते, त्याचाच प्रत्यय या निकालांनी आला. लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिकेत मनसेचा सारा प्रचार केवळ राज ठाकरेंच्या मोठ्या सभा व भाषणांभोवतीच घुटमळला. त्यातही ‘संपूर्ण सत्ता द्या, मग बघा कसा बदल घडवितो, सगळ्यांना सुतासारखा सरळ करतो,’ या शाब्दिक फटाक्यांपुढे राज ठाकरेंकडेही काही नव्हते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे केवळ आराखडा मांडतात. खरेतर या आराखड्यातील अनेक कामे आमदार, नगरसेवकांच्या निधीतूनही करता आली असती. विरोधी बाकांवर बसणाऱ्यांनाही निधी मिळतो आणि त्यातून किमान स्वत:च्या मतदारसंघात, प्रभागात विकासकामे करतात आली असती. याकडे मनसे नेत्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले असले, तरी मतदारांनी मात्र याची गंभीर नोंद घेत मनसेला चपराक लगावली, पण आपल्याच ‘कोषा’त वावरणाऱ्या बेफिकीर मनसे नेतृत्वाला त्याची तमाच नाही. आता मैदानात उतरून घाम गाळल्याशिवाय, मुंबई-नाशकात मनसेचे इंजिन धावण्याची सुतराम शक्यता नाही, इतके मात्र कल्याण-डोंबिवलीने ठळकपणे अधोरेखित केले आहे.