शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मनसेचे ‘इंजिन’ लागले धक्क्याला!

By admin | Updated: November 3, 2015 02:34 IST

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीत दारुण पराभव करून, मतदारांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात, मनसेचे इंजिन जणू कायमचे धक्क्याला लावले.

- गौरीशंकर घाळे (विश्लेषण)लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीत दारुण पराभव करून, मतदारांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात, मनसेचे इंजिन जणू कायमचे धक्क्याला लावले.कल्याण-डोंबिवलीत मागील निवडणुकीत मनसेला २७ जागांवर विजय मिळाला होता. या वेळी केवळ ९ जागाच मनसेला राखता आल्या. प्रभागरचना बदलल्याने फटका बसला, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. मात्र, २७ नगरसेवकांचे काम इतके मर्यादित होते की, फेररचनेनंतर त्यांच्या तोंडाला अक्षरश: फेस आला. शिवाय, कुंभमेळ्याच्या निमित्ताने शासनाने नाशकात केलेल्या कामाची टेप त्यांनी स्वत:च्या नावाने जोरदार वाजविली, पण मतदारांनी त्यांचा हा बनाव पुरता उघडा पाडला. फक्त भाषणबाजीवर निवडणुका जिंकता येत नाहीत. पक्ष नेतृत्वाची विश्वासार्हता संपली की नेमके काय होते, त्याचाच प्रत्यय या निकालांनी आला. लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिकेत मनसेचा सारा प्रचार केवळ राज ठाकरेंच्या मोठ्या सभा व भाषणांभोवतीच घुटमळला. त्यातही ‘संपूर्ण सत्ता द्या, मग बघा कसा बदल घडवितो, सगळ्यांना सुतासारखा सरळ करतो,’ या शाब्दिक फटाक्यांपुढे राज ठाकरेंकडेही काही नव्हते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे केवळ आराखडा मांडतात. खरेतर या आराखड्यातील अनेक कामे आमदार, नगरसेवकांच्या निधीतूनही करता आली असती. विरोधी बाकांवर बसणाऱ्यांनाही निधी मिळतो आणि त्यातून किमान स्वत:च्या मतदारसंघात, प्रभागात विकासकामे करतात आली असती. याकडे मनसे नेत्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले असले, तरी मतदारांनी मात्र याची गंभीर नोंद घेत मनसेला चपराक लगावली, पण आपल्याच ‘कोषा’त वावरणाऱ्या बेफिकीर मनसे नेतृत्वाला त्याची तमाच नाही. आता मैदानात उतरून घाम गाळल्याशिवाय, मुंबई-नाशकात मनसेचे इंजिन धावण्याची सुतराम शक्यता नाही, इतके मात्र कल्याण-डोंबिवलीने ठळकपणे अधोरेखित केले आहे.