शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचे गजाननाला लिहिलेले पत्र सापडले..!

By अतुल कुलकर्णी | Updated: May 15, 2022 09:28 IST

काही वर्षांपूर्वी आपण आपल्या आई-वडिलांना, मित्रांना, प्रेयसीला पत्रं लिहीत होतो. प्रेम करणाऱ्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रं आजही जपून ठेवली असतील.

अतुल कुलकर्णी

काही वर्षांपूर्वी आपण आपल्या आई-वडिलांना, मित्रांना, प्रेयसीला पत्रं लिहीत होतो. प्रेम करणाऱ्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रं आजही जपून ठेवली असतील. भावना व्यक्त करण्यासाठी, एकमेकांना ज्या गोष्टी जाहीरपणे सांगता येत नाहीत ते सांगण्यासाठी पत्रं लिहिण्याची परंपरा मोबाईल संस्कृतीने संपवून टाकली. पत्र लिहिताना लोक कविता करायचे, शब्दांशी खेळायचे, आता ते एसएमएसशी खेळतात. सगळ्या चांगल्या गोष्टी, संस्कृती अशा मोडीत निघताना पाहून अस्वस्थ झालेल्या राज ठाकरे यांनी थेट गणरायालाच पत्र लिहायचा निर्णय घेतला. तसं आधी त्यांनी त्यांच्या मोठ्या बंधूंना पत्र लिहिलं, पण ते पडले मुख्यमंत्री. त्यांच्या कार्यालयातून ‘‘आपले पत्र मिळाले, योग्य त्या विभागाकडे पत्र पाठवण्यात आले आहे’’ असा संदेश आल्याचे वृत्त हाती आले आहे. याआधी देखील त्यांनी अनेक नेत्यांना पत्रे लिहिली होती. आता यावेळी त्यांनी थेट गणपतीलाच पत्र लिहिलं त्याची कॉपी चुकून बाबूरावांच्या हाती लागली. ती अशी...

प्रिय गजानना, बाप्पा,मोरया... साष्टांग दंडवत !

तुझ्या राज्यात हे जे काही चालूयं ना... ते तू कसं काय खपवून घेतोस... वरती हसतमुखही असतोस... पत्राच्या नादात विसरून जाईन पुन्हा, पण ही जी कला आहे ना तुझ्याकडे तेवढी शिकवून जा... मला हल्ली पटकन् रागबिग येत असतो. बरं ते जाऊ देत. मी काय म्हणत होतो, तुझ्या आशीर्वादाने मी हाती घेतलेलं आंदोलन जोर धरत आहे. भोंग्यांचा (हिंदुत्वाचा नाही) मुद्दा मराठीपेक्षा भारी झाला आहे. हे माझ्या लक्षात आलंय. लोक विनाकारण भोंग्याचा संबंध धर्माशी जोडतात. पण तसं नाहीयं... भोंगा वाजल्याशिवाय आपल्या नावाचा डंका तरी कसा वाजणार? आता थेट तिकडे उत्तर प्रदेशात माझ्या विरुद्ध मोर्चे चालू आहेत. त्यांना आपल्या इथून फूस आहे याची खबरबात तुलाही आलीच असेल... काही असो. आपल्याला आता भोंगा सोडायचा नाहीय... 

बाप्पा तुला आठवत असेलच. काही वर्षांपूर्वी मी मराठीचा मुद्दा हाती घेतला होता... त्यावेळी राज्यभर आपलीच चर्चा होत होती. त्यावेळी मी मराठीची पताका खांद्यावर घेतली होती; कारण राज्यात तुझं स्वागत मराठी पाट्यांनी करायचं, अशी माझी इच्छा होती. याला आता किती तरी वर्षे झाली. तुला सगळीकडे मराठी पाट्या दिसाव्यात, तू खुश व्हावे आणि या राज्याला संपन्न करावे, अशी मी मनोमन प्रार्थना देखील केली होती त्यावेळी... कोणी काहीही म्हणो, मी त्यांच्या बापालाही भीत नाही... आता देखील मी भोंग्यांचा मुद्दा समाजातलं प्रदूषण दूर करण्यासाठी काढला आहे. तो काही धर्माचा मुद्दा नाही. हे सांगूनही कळत नाही कोणाला... मी पण मागे हटणारा नाही... या आधी टोलचा विषय असेल किंवा मराठीचा... मी मागे हटलो नाही ना... तसाच आताही मागे हटणार नाही...

गजानना, माझी एक इच्छा आहे. आज तुला सांगून टाकतो. या राज्यात जशी मराठी पाट्या लावून काही लगेच क्रांती होणार नाही. मात्र भोंग्याचा विषय घेतल्यामुळे बघ, आपल्या पक्षात कसं नवचैतन्य आलंय. त्यामुळेच दादूच्या सरकारनं माझ्या २८ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. आमचा संदीप, एवढी मेहनत करतो, त्याला इकडं तिकडं फिरावं लागत आहे. एक दिवस आपलाही येईल ना बाप्पा... मग बघ... कसा महाराष्ट्र करून दाखवतो ते...

मला काही जण विचारत आहेत की, तिकडे यूपीवाले भैय्ये माझ्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. मी भोंग्याचा विषय घेतल्यामुळं मंदिरातले भोंगे देखील काढावे लागतील आणि त्याचा ताप आपल्याला नको म्हणून कमळाबाईनं ते जाणून-बजून नाटक सुरू केलंय... पण त्यामुळे बाप्पा, तिकडे ते माझ्या विरोधात बोलतील, तर इकडे मराठी माणूस माझ्या बाजूने एकवटून येणार की नाही... कशाला कोण दादू सोबत जाईल...? आणि इथल्या यूपी, बिहारींना खळ्ळ् खट्याक काय असतं ते माहितीच आहे. योग्य वेळ आली की देईन दाखवून मी...  तेव्हा तुझी कृपा अशीच राहू दे...

तुझाच - राज ठाकरे 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे