शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शिंदे गटाच्या आमदारानं देवेंद्र फडणवीसांना विचारला जाब; "अहो, तुमच्याकडे बघून.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 16:41 IST

कुठेही भ्रष्टाचार झाला असेल तर कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही असं फडणवीसांनी सभागृहात म्हटलं.

मुंबई - शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहिती आहे. विधानसभेत आज महाराष्ट्र सदन घोटाळ्याची लक्षवेधी मांडत कांदे यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांवर निशाणा साधत शिंदे-फडणवीस सरकारलाच जाब विचारला. या लक्षवेधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरावर माझे समाधान झाले नाही असंही कांदे यांनी म्हटलं. 

सभागृहात सुहास कांदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रेरणा घेऊन आम्ही त्यांच्यासोबत आलो. मागील मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद करण्याचा निर्णय घेतला म्हणून आलो. ते निर्णय योग्य घेतले असते तर ही वेळ आली नसती. उपमुख्यमंत्री फडणवीस गोलमाल उत्तर देतायेत. जवळपास ११६० कोटींचा घोटाळा आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रकरण मागे घेतले. पूर्वीच्या सरकारचे निर्णय आपण बदलले मग, हा निर्णय बदलण्यास हरकत काय? असा सवाल त्यांनी उपस्थित करत मागील सरकारनं भुजबळ प्रकरणाची फाईल बंद केली त्यावर भाष्य केले. 

तसेच ११६० कोटींचा हा घोटाळा आहे. गृहमंत्र्यांनी जे उत्तर दिलंय त्याने मी समाधानी नाही. गृहमंत्री भ्रष्टाचाराला पाठिशी घालताय. आम्ही तुमच्याकडे बघून आलोय. तत्कालीन मंत्र्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी जीआर काढण्यात आला. त्यानंतर २१-३-२२ रोजी पत्रही दिले. मग त्यानंतर काय प्रेम उफाळून आले सरकार अपिलात गेले नाही. सरकार अपिलात जाणार का? असा प्रश्न सुहास कांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला. 

त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कुठेही भ्रष्टाचार झाला असेल तर कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. आपण म्हणता ती वस्तूस्थिती आहे. हे २ जीआर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केले आहेत. विधी न्याय विभागाचे एक मत होते. परंतु मुख्यमंत्र्यांचे वेगळे मत होते. हा निर्णय पुन्हा तपासायचा असेल तर कायदेशीर बाजू तपासून पाहावी लागेल. आवश्यकता असेल कायदेशीर बाजू तपासून देशाचे एजी, सॉलिसिटर जनरलचं मतही जाणून घेऊ. कायदेशीर मुद्दे राजकीय दृष्ट्याने विचार करून चालणार नाही. तुमच्या मताची गंभीर दखल घेतली जाईल असं आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस