शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"तुम्हाला लाज वाटत नाही का?"; एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन बच्चू कडूंनी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:32 IST

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावरुन आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Bacchu Kadu on ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरलं. तुम्हाला लाज वाटत नाही का अशा शब्दात बच्चू कडू यांनी सरकारला फटकारलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरुन विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले होते. त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी यासाठीची समिती काम करत असून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील असे म्हटलं. यावरुन आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावरुन सरकारला घेरलं. 

विधानसभेत विरोधी पक्षाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात पाच हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली. तसेच चांगल्या दर्जाच्या बस उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी दर १० वर्षांनी शासकीय कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती केली जाते, असे सांगितले. तसेच २०२० आणि २०२४ साली वेतनकरार होऊ शकला नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर उच्चस्तरीय कमिटी नेमण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानुसार पुढे पावले उचलली जाणार आहेत, असे मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं.

त्यावर बोलताना दादा भुसेंनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी दिली. गेल्या चार पाच वर्षात एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत, असे वैभव नाईक यांनी म्हटलं. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचा पगार १० तारखेच्या आत केला जातो असं म्हटलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक होत एसटी महामंडळाच्या चालकाला जास्त पगार का मिळत नाही असा सवाल केला.

"दादा भुसेंनी फक्त सत्य सांगावं. अध्यक्ष महोदय तुमच्या किंवा दादा भुसेंच्या चालकाला जो पगार मिळतो, तो एसटी महामंडळाच्या चालकाला का मिळत नाही. तुमच्या गाडीचे चालक एसीमधून फिरतात. पण एसटीचा चालक भर उन्हाच एसटीत बसला की चौफेर घाम येतो. त्याचे कष्ट जास्त आहेत पण त्यांना पगार कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त अन्यायासाठी अफजलखान फाडला होता. तुम्ही अन्याय का करत आहात? किमान वेतन कायदा सांगतो की किमान १४ हजाराच्या वर वेतन दिलं पाहिजे. शासनच जर कायदा मोडत असेल, तर थोबाडीत कुणाच्या मारायची? काय सत्य आहे, काय असत्य आहे हे तुम्ही सांगा ना? तुम्हाला राग काय येत नाही का? याची लाज वाटली पाहिजे थोडी. एका चालकाला तुम्ही २५ ते ३० हजार पगार देता आणि जो सगळ्यांची सेवा करतो, त्याला तुम्ही १२ हजार पगार देता? याची तुम्हाला लाज वाटत नाही का?," असा सवाल बच्चू कडू यांनी केला. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाST Strikeएसटी संपBacchu Kaduबच्चू कडू