शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्हाला लाज वाटत नाही का?"; एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन बच्चू कडूंनी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:32 IST

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावरुन आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Bacchu Kadu on ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरलं. तुम्हाला लाज वाटत नाही का अशा शब्दात बच्चू कडू यांनी सरकारला फटकारलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरुन विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले होते. त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी यासाठीची समिती काम करत असून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील असे म्हटलं. यावरुन आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावरुन सरकारला घेरलं. 

विधानसभेत विरोधी पक्षाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात पाच हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली. तसेच चांगल्या दर्जाच्या बस उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी दर १० वर्षांनी शासकीय कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती केली जाते, असे सांगितले. तसेच २०२० आणि २०२४ साली वेतनकरार होऊ शकला नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर उच्चस्तरीय कमिटी नेमण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानुसार पुढे पावले उचलली जाणार आहेत, असे मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं.

त्यावर बोलताना दादा भुसेंनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी दिली. गेल्या चार पाच वर्षात एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत, असे वैभव नाईक यांनी म्हटलं. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचा पगार १० तारखेच्या आत केला जातो असं म्हटलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक होत एसटी महामंडळाच्या चालकाला जास्त पगार का मिळत नाही असा सवाल केला.

"दादा भुसेंनी फक्त सत्य सांगावं. अध्यक्ष महोदय तुमच्या किंवा दादा भुसेंच्या चालकाला जो पगार मिळतो, तो एसटी महामंडळाच्या चालकाला का मिळत नाही. तुमच्या गाडीचे चालक एसीमधून फिरतात. पण एसटीचा चालक भर उन्हाच एसटीत बसला की चौफेर घाम येतो. त्याचे कष्ट जास्त आहेत पण त्यांना पगार कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त अन्यायासाठी अफजलखान फाडला होता. तुम्ही अन्याय का करत आहात? किमान वेतन कायदा सांगतो की किमान १४ हजाराच्या वर वेतन दिलं पाहिजे. शासनच जर कायदा मोडत असेल, तर थोबाडीत कुणाच्या मारायची? काय सत्य आहे, काय असत्य आहे हे तुम्ही सांगा ना? तुम्हाला राग काय येत नाही का? याची लाज वाटली पाहिजे थोडी. एका चालकाला तुम्ही २५ ते ३० हजार पगार देता आणि जो सगळ्यांची सेवा करतो, त्याला तुम्ही १२ हजार पगार देता? याची तुम्हाला लाज वाटत नाही का?," असा सवाल बच्चू कडू यांनी केला. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाST Strikeएसटी संपBacchu Kaduबच्चू कडू