शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

‘त्या’ बेपत्ता अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या , कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:16 IST

तालुक्यातील वावेतर्फे निजामपूर येथील आठ वर्षीय दिया जाईलकर ही मुलगी दुकानातून पेप्सी आणायला गेली, ती परतलीच नाही

माणगाव : तालुक्यातील वावेतर्फे निजामपूर येथील आठ वर्षीय दिया जाईलकर ही मुलगी दुकानातून पेप्सी आणायला गेली, ती परतलीच नाही. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील जयेंद्र यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली होती. सोमवारी २८ मे रोजी रात्री ८ वाजता गावातील एका पडक्या घरात दियाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली.माणगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. वावे व आसपासच्या गावात तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कोठेही सापडली नाही. चार दिवसांनी २८ मे रोजी रात्री गावात बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना एका बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने, त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता, हातपाय व तोंड बांधलेल्या स्थितीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. अधिक तपासाततो मृतदेह दियाचा असल्याचे निष्पन्न झाले.आपल्या मुलीचा मृतदेह पाहताच आईवडिलांनी हंबरडा फोडला. वडिलांनी आपल्या डोक्यावर हत्याराने वार करून घेतले. त्यात ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांना माणगांव उपजिल्हा रुग्णालयात तातडीने औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर, मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री ९ वाजता माणगांव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पंचनामा झाल्यावर रात्री १ वाजता दियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला होता.घटनेचे तीव्र पडसाद तालुक्यात सर्वत्र उमटले. माणगावात आरोपीचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. गोरेगांव शहरात आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला, तसेच माणगांव तालुक्यातील गोरेगांव, लोणेरे, माणगाव शहर, इंदापूर, निजामपूर आदी महत्त्वाच्या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. दियाच्या मृतदेहावर मंगळवारी वावे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.राजकीय वैमनस्यातून हत्या?स्थानिक उणेगांव ग्रामपंचायतीची निवडणूक २७ मे रोजी होती. या निवडणुकीत दियाची आई पंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आली. दिया मतदानाच्या दोन दिवस अगोदर बेपत्ता झाली होती. त्यानंतर, मतमोजणीच्या दिवशी दियाचा मृतदेह गावात सापडला. त्यामुळे ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.