शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

‘त्या’ बेपत्ता अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या , कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:16 IST

तालुक्यातील वावेतर्फे निजामपूर येथील आठ वर्षीय दिया जाईलकर ही मुलगी दुकानातून पेप्सी आणायला गेली, ती परतलीच नाही

माणगाव : तालुक्यातील वावेतर्फे निजामपूर येथील आठ वर्षीय दिया जाईलकर ही मुलगी दुकानातून पेप्सी आणायला गेली, ती परतलीच नाही. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील जयेंद्र यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली होती. सोमवारी २८ मे रोजी रात्री ८ वाजता गावातील एका पडक्या घरात दियाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली.माणगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. वावे व आसपासच्या गावात तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कोठेही सापडली नाही. चार दिवसांनी २८ मे रोजी रात्री गावात बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना एका बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने, त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता, हातपाय व तोंड बांधलेल्या स्थितीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. अधिक तपासाततो मृतदेह दियाचा असल्याचे निष्पन्न झाले.आपल्या मुलीचा मृतदेह पाहताच आईवडिलांनी हंबरडा फोडला. वडिलांनी आपल्या डोक्यावर हत्याराने वार करून घेतले. त्यात ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांना माणगांव उपजिल्हा रुग्णालयात तातडीने औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर, मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री ९ वाजता माणगांव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पंचनामा झाल्यावर रात्री १ वाजता दियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला होता.घटनेचे तीव्र पडसाद तालुक्यात सर्वत्र उमटले. माणगावात आरोपीचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. गोरेगांव शहरात आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला, तसेच माणगांव तालुक्यातील गोरेगांव, लोणेरे, माणगाव शहर, इंदापूर, निजामपूर आदी महत्त्वाच्या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. दियाच्या मृतदेहावर मंगळवारी वावे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.राजकीय वैमनस्यातून हत्या?स्थानिक उणेगांव ग्रामपंचायतीची निवडणूक २७ मे रोजी होती. या निवडणुकीत दियाची आई पंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आली. दिया मतदानाच्या दोन दिवस अगोदर बेपत्ता झाली होती. त्यानंतर, मतमोजणीच्या दिवशी दियाचा मृतदेह गावात सापडला. त्यामुळे ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.