शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

‘त्या’ बेपत्ता अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या , कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:16 IST

तालुक्यातील वावेतर्फे निजामपूर येथील आठ वर्षीय दिया जाईलकर ही मुलगी दुकानातून पेप्सी आणायला गेली, ती परतलीच नाही

माणगाव : तालुक्यातील वावेतर्फे निजामपूर येथील आठ वर्षीय दिया जाईलकर ही मुलगी दुकानातून पेप्सी आणायला गेली, ती परतलीच नाही. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील जयेंद्र यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली होती. सोमवारी २८ मे रोजी रात्री ८ वाजता गावातील एका पडक्या घरात दियाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली.माणगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. वावे व आसपासच्या गावात तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कोठेही सापडली नाही. चार दिवसांनी २८ मे रोजी रात्री गावात बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना एका बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने, त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता, हातपाय व तोंड बांधलेल्या स्थितीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. अधिक तपासाततो मृतदेह दियाचा असल्याचे निष्पन्न झाले.आपल्या मुलीचा मृतदेह पाहताच आईवडिलांनी हंबरडा फोडला. वडिलांनी आपल्या डोक्यावर हत्याराने वार करून घेतले. त्यात ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांना माणगांव उपजिल्हा रुग्णालयात तातडीने औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर, मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री ९ वाजता माणगांव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पंचनामा झाल्यावर रात्री १ वाजता दियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला होता.घटनेचे तीव्र पडसाद तालुक्यात सर्वत्र उमटले. माणगावात आरोपीचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. गोरेगांव शहरात आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला, तसेच माणगांव तालुक्यातील गोरेगांव, लोणेरे, माणगाव शहर, इंदापूर, निजामपूर आदी महत्त्वाच्या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. दियाच्या मृतदेहावर मंगळवारी वावे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.राजकीय वैमनस्यातून हत्या?स्थानिक उणेगांव ग्रामपंचायतीची निवडणूक २७ मे रोजी होती. या निवडणुकीत दियाची आई पंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आली. दिया मतदानाच्या दोन दिवस अगोदर बेपत्ता झाली होती. त्यानंतर, मतमोजणीच्या दिवशी दियाचा मृतदेह गावात सापडला. त्यामुळे ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.