शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बेपत्ता अश्विनी बिद्रेची हत्या करून खाडीत मृतदेह फेकल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 02:58 IST

बेपत्ता पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याचा साथीदार राजेश पाटीलने हत्या करून त्यांचा मृतदेह भार्इंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय दोघांच्याही टॉवर लोकेशनवरून वर्तवण्यात येत आहे. यासाठी कुरुंदकर यांची गाडी वापरल्याची माहितीही समोर येत आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत़

मुंबई : बेपत्ता पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याचा साथीदार राजेश पाटीलने हत्या करून त्यांचा मृतदेह भार्इंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय दोघांच्याही टॉवर लोकेशनवरून वर्तवण्यात येत आहे. यासाठी कुरुंदकर यांची गाडी वापरल्याची माहितीही समोर येत आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत़नवी मुंबई मानवाधिकार विभागात कार्यरत असलेल्या बिद्रे यांचे ठाणे ग्रामीणचे कुरुंदकर यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते. कुरुंदकर यांना पत्नी व दोन मुले आहेत. बिद्रे यांनी कुरुंदकर यांच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. यामुळे कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोज भांडणे होत होती. कुरुंदकर यांनीच बिद्रे यांचा काटा काढल्याचा संशय आहे. ११ एप्रिल २०१६ रोजी बिद्रे कळंबोली येथील घरातून निघाल्या. तेथून त्या सायंकाळी ६ च्या सुमारास कळंबोली रेल्वे स्थानकावरून कुरुंदकरला भार्इंदर भेटायला गेल्या. रात्री ११ च्या सुमारास त्यांचा मोबाइल बंद होता. रात्री २.४० वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्यांचा साथीदार राजेश पाटील (माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा) यांचे मोबाइल टॉवर लोकेशन भार्इंदर पुलावरील येत आहे.अश्विनीची हत्या करून कुरुंदकरने त्यांना याच खाडीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. यासाठी कुरुंदकरने त्यांच्या लाल रंगाच्या फोक्स वॅगन (वाहन क्रमांक एमएच १० ए एन ५५००) या गाडीचा वापर केला असल्याचे समोर येत आहे. ही गाडी सांगलीच्या धामणी रोड येथील जीनेश्वर कॉलनीतील रहिवासी रमेश चारुदत्त जोशी यांच्या नावावर आहे. त्याने ही गाडी कुरुंदकरला भेट दिल्याचे समोर येत आहे. जुलै २०१६ मध्ये कळंबोली पोलिसांनी बिद्रे यांच्या इमारतीखालील दोन सुरक्षारक्षकांचे जबाब नोंदविले होते.कुरुंदकर यांच्या घरातून रक्ताचे डाग असलेला टॉवेल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा टॉवेल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. यावरून हे रक्त बिद्रे यांचे आहे का, हे तपासण्यासाठी बिद्रे यांचे पती राजू गोरे व आठ वर्षांच्या मुलीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. दोन्ही रक्ताचे नमुने डीएनएसाठी पाठविण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.मच्छीमारांचे जबाब नोंदविलेबिद्रे यांची हत्या केल्याच्या काही दिवसांनंतर कुरुंदकर भार्इंदरच्या खाडीला भेट देत होते. तेथील स्थानिकांशी संपर्क साधून एक मृतदेह आढळला का याची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी काही मच्छीमारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हत्या झाल्यानंतर बिद्रे यांच्या वडिलांना कुरुंदकरने काही दिवस उत्तराखंडमध्ये मेडिटेशनला जात असल्याचा संदेश मोबाइलवरून पाठवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण