शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

मदतीसाठी मोजकेच लोकप्रतिनिधी

By admin | Updated: September 17, 2015 01:15 IST

दुष्काळी परिस्थितीत एकीकडे राज्य शासनाकडून अजून फारसा दिलासा मिळत नसल्याचे चित्र असताना दुसरीकडे मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक लोकप्रतिनिधी

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीत एकीकडे राज्य शासनाकडून अजून फारसा दिलासा मिळत नसल्याचे चित्र असताना दुसरीकडे मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक लोकप्रतिनिधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येत नसल्याची स्थिती आहे.शासकीय यंत्रणा सक्रीय करण्याच्या कामी मराठवाड्यातील बबनराव लोणीकर आणि पंकजा मुंडे हे दोन कॅबिनेट मंत्री आघाडीवर आहेत. आढावा बैठकांपासून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. विभागातील आठ खासदारांपैकी अशोक चव्हाण (नांदेड), रावसाहेब दानवे (जालना), बंडू जाधव (परभणी), राजीव सातव (हिंगोली), प्रीतम मुंडे (बीड), चंद्रकांत खैरे (औरंगाबाद), सुनील गायकवाड (लातूर) हे सात खासदार सक्रीय आहेत. बैठका, दौरे आणि अधिकाऱ्यांना सूचना या पातळीवर त्यांचे काम दिसून येत आहे. उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड मात्र या परिस्थितीत सक्रीय नसल्याचे दिसते. त्यांचा मोबाईल सतत बंद राहत असल्याने शेतकरी त्यांच्या कानावर तक्रारीही घालू शकत नाही, अशी स्थिती आहे. लातूर जिल्ह्यातही त्यांच्याबाबत ओरड आहे. आमदारांमध्ये सत्तारुढ भाजपा- शिवसेनेचे अर्जुन खोतकर, संदिपान भुमरे, संभाजी पाटील निलंगेकर, प्रशांत बंब, जयप्रकाश मुंदडा, तानाजी मुटकुळे, हेमंत पाटील अत्यंत सक्रीय आहेत. तर विरोधी पक्षातील राजेश टोपे, राणा जगजितसिंह, अब्दुल सत्तार, अमिता चव्हाण, अमित देशमुख, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरण्याबरोबरच बैठका आणि नियोजनात सहभाग दर्शविला आहे. विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांची या पार्श्वभूमीवर एकही बैठक झाली नाही. पालकमंत्र्यांचेही दुर्लक्ष..पालकमंत्र्यांमध्ये उस्मानाबादचे डॉ. दीपक सावंत, औरंगाबादचे रामदास कदम यांचे दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष झाले आहे. बीड आणि लातूरच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचे लातूरपेक्ष़ा बीडकडे अधिक लक्ष असल्याचे दिसते. तर नांदेडचे पालकमंत्री असलेले दिवाकर रावते नांदेडपेक्षा औरंगाबादमध्ये जादा रस दाखवित असल्याचे चित्र आहे. बैठकीलाही ते उशीरा आले होते.