शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मदतीसाठी मोजकेच लोकप्रतिनिधी

By admin | Updated: September 17, 2015 01:15 IST

दुष्काळी परिस्थितीत एकीकडे राज्य शासनाकडून अजून फारसा दिलासा मिळत नसल्याचे चित्र असताना दुसरीकडे मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक लोकप्रतिनिधी

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीत एकीकडे राज्य शासनाकडून अजून फारसा दिलासा मिळत नसल्याचे चित्र असताना दुसरीकडे मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक लोकप्रतिनिधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येत नसल्याची स्थिती आहे.शासकीय यंत्रणा सक्रीय करण्याच्या कामी मराठवाड्यातील बबनराव लोणीकर आणि पंकजा मुंडे हे दोन कॅबिनेट मंत्री आघाडीवर आहेत. आढावा बैठकांपासून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. विभागातील आठ खासदारांपैकी अशोक चव्हाण (नांदेड), रावसाहेब दानवे (जालना), बंडू जाधव (परभणी), राजीव सातव (हिंगोली), प्रीतम मुंडे (बीड), चंद्रकांत खैरे (औरंगाबाद), सुनील गायकवाड (लातूर) हे सात खासदार सक्रीय आहेत. बैठका, दौरे आणि अधिकाऱ्यांना सूचना या पातळीवर त्यांचे काम दिसून येत आहे. उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड मात्र या परिस्थितीत सक्रीय नसल्याचे दिसते. त्यांचा मोबाईल सतत बंद राहत असल्याने शेतकरी त्यांच्या कानावर तक्रारीही घालू शकत नाही, अशी स्थिती आहे. लातूर जिल्ह्यातही त्यांच्याबाबत ओरड आहे. आमदारांमध्ये सत्तारुढ भाजपा- शिवसेनेचे अर्जुन खोतकर, संदिपान भुमरे, संभाजी पाटील निलंगेकर, प्रशांत बंब, जयप्रकाश मुंदडा, तानाजी मुटकुळे, हेमंत पाटील अत्यंत सक्रीय आहेत. तर विरोधी पक्षातील राजेश टोपे, राणा जगजितसिंह, अब्दुल सत्तार, अमिता चव्हाण, अमित देशमुख, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरण्याबरोबरच बैठका आणि नियोजनात सहभाग दर्शविला आहे. विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांची या पार्श्वभूमीवर एकही बैठक झाली नाही. पालकमंत्र्यांचेही दुर्लक्ष..पालकमंत्र्यांमध्ये उस्मानाबादचे डॉ. दीपक सावंत, औरंगाबादचे रामदास कदम यांचे दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष झाले आहे. बीड आणि लातूरच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचे लातूरपेक्ष़ा बीडकडे अधिक लक्ष असल्याचे दिसते. तर नांदेडचे पालकमंत्री असलेले दिवाकर रावते नांदेडपेक्षा औरंगाबादमध्ये जादा रस दाखवित असल्याचे चित्र आहे. बैठकीलाही ते उशीरा आले होते.