शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

मंत्रालयाची इमारत असुरक्षित?

By admin | Updated: September 22, 2016 05:04 IST

इमारतीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारच नेमला नव्हता, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतली आहे.

अतुल कुलकर्णी,

मुंबई- आगीनंतर नूतनीकरण केलेल्या मंत्रालय इमारतीसाठी बांधकाम मजबुती प्रमाणपत्र (स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) घेतल्यानंतर, आता या इमारतीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारच नेमला नव्हता, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतली आहे. त्यामुळे मंत्रालय इमारतीच्या बांधकाम सुरक्षिततेची हमी कोण घेणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.तब्बल २६० कोटी रुपये खर्चून इमारत नूतनीकरणाचे काम कोणाच्या देखरेखीखाली केले गेले? यामागे नेमके कोण अधिकारी आहेत, असे प्रश्न असून, याची एसीबीमार्फत चौकशी केल्यास अनेक बडे अधिकारी यात अडकतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मंत्रालयाला आग लागल्यानंतर जुनी इमारत पाडून पुन्हा नव्याने बांधायची की, आहे त्या इमारतीचेच नूतनीकरण करायचे? असा प्रश्न आला, तेव्हा नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, असा आग्रह तत्कालीन बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी धरला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हे काम भुजबळांच्या नेतृत्वाखाली होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी खासगी विकासकाकडून निविदा मागविण्याचा निर्णय घेतला. खासगी आर्किटेक्टची नेमणूक निविदा प्रक्रीया करून पूर्ण करावी, असे प्रधान सचिवांनी लेखी कळवूनही भुजबळांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा करत, राजा अडेरी यांची नेमणूक स्वत:च्या सहीने कोणतीही विहीत शासकीय प्रक्रिया पार न पाडता करून टाकली. त्यातूनच पुढे खासगी विकासक युनिटी कन्स्ट्रक्शन्स आणि राजा अडेरी या दोघांमध्ये बांधकाम खात्याचे अधिकारी विभागले गेले आणि २६० कोटी रुपये खर्च करणाऱ्या बांधकाम खात्याला सल्लागार राजे स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांचे अवघे अडीच कोटींचे देणे जड झाले आणि हा सगळा विषय बाहेर आला आहे.मंत्रालयाच्या आगीनंतर झालेल्या हजारो पानांच्या पत्रव्यवहारात राजे स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांच्या नावाचे शेकडो संदर्भ आहेत. मात्र, बांधकाम खात्याच्या मुलुंड विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. नितीन टोणगावकर यांच्या सहीने एक पत्र इलाखा शहर विभागाला पाठवले गेले, ज्यात राजे स्ट्रक्चरल कंपनीला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा जावई शोध लावण्यात आला. विशेष म्हणजे, हे पत्र नवीन मंत्रालय सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर, २० जानेवारी २०१६ चे आहे. त्याआधी याच टोणगावकर यांच्या सहीचे एक पत्र दुरुस्तीचे काम सुरू असतानाचे म्हणजे ३० आॅक्टोबर २०१३चे आहे. ज्यात त्यांनी युनिटी इन्फ्रास्ट्रक्चरला लिहिले आहे की, ‘प्रकल्प सल्लागार राजे यांनी मंत्रालयात बसवलेल्या सरकत्या जिन्यांचे रेडिओग्राफीक टेस्ट करून घ्या, असे सांगितले आहे. तातडीने कारवाई करा,’ हे एकच उदाहरण मंत्रालयाचे नूतनीकरण करताना अधिकाऱ्यांनी केलेली मनमानी समोर आणण्यास पुरेसे आहे. (‘लोकमत’कडे याविषयीची शेकडो पाने आहेत)>कोणाचे खरे आणि कोणाचे खोटे ?मंत्रालयाच्या आगीनंतर सगळे काम पूर्ण झाले आणि फडणवीस सरकारच्या काळात स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट राजे यांच्या कंपनीने देण्यात आले. त्याच्या आधारे मुंबई महापालिकेने ओसी दिली आणि सगळे मंत्री कामाला आले.असे असतानाही राजे यांच्या कंपनीला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमण्याचा प्रश्नच येत नाही, असे कार्यकारी अभियंता डॉ. नितीन टोणगावकर म्हणत असतील, तर मग मंत्रालय सुरक्षित आहे की नाही याची तपासणी केली कोणी, मंत्रालयाच्या स्ट्रक्चरची तपासणी केली कोणी, असे प्रश्न उपस्थित होतात.स्ट्रक्चरची तपासणी झाल्याशिवाय मंत्री आता तिथे काम करू लागले का? आणि उद्या काही धोका झाला, तर त्याची जबाबदारी बांधकाम विभाग आणि टोणगावकर घेणार आहेत का, जर राजे यांचे प्रमाणपत्र खरे मानले, तर टोणगावकर कोणाला पाठीशी घालत आहेत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.