शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

मंत्र्यांना धाडणार सडके आंबे!

By admin | Updated: January 31, 2015 05:32 IST

गारपीट आणि थंडीच्या तडाख्याने कोकणातील हापूस आंबा आणि भातशेतीचे ५० टक्के नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारमार्फत एकाही

मुंबई : गारपीट आणि थंडीच्या तडाख्याने कोकणातील हापूस आंबा आणि भातशेतीचे ५० टक्के नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारमार्फत एकाही शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. परिणामी, भात शेतकरी आणि आंबा उत्पादकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी राणे यांनी सडक्या आंब्यांनी भरलेल्या पेट्या शिवसेना आणि भाजपा मंत्र्यांना पाठवल्याचे सांगितले.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २ हजार कोटींच्या पॅकेजमध्ये कोकणाचा उल्लेख नाही. शिवाय हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने कोकणातील शेतकऱ्यांना घोषित केलेली मदत खूपच तुटपुंजी आहे. कोकणवासीयांनी शिवसेना आणि भाजपाला २३ आमदार दिले आहेत. मात्र सरकारमध्ये त्यांचा दबदबा दिसत नसल्याची टीकाही नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना सडके आंबे पाठवले. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नसल्याने मंत्र्यांना सडके आंबे पाठवत असल्याचे राणे यांनी सांगितले. यापुढेही नुकसानभरपाई करण्यास राज्य सरकारने दिरंगाई केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)