शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

कराच्या प्रश्नावरून मंत्र्यांमध्ये विसंगती

By admin | Updated: July 15, 2015 00:33 IST

मुंबईकरांकडून महापालिकेने २०१० ते २०१५ या काळात वसूल केलेला १२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त कर परत करण्याची जोरदार मागणी मुंबईतील भाजपाच्या

मुंबई : मुंबईकरांकडून महापालिकेने २०१० ते २०१५ या काळात वसूल केलेला १२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त कर परत करण्याची जोरदार मागणी मुंबईतील भाजपाच्या आमदारांनी केली. याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे उत्तर नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले खरे; परंतु मुंबईकरांकडून जास्त रक्कम घेतलीच नव्हती, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात केल्याने मंत्र्यांची चांगलीच फजिती झाली.भाजपाचे अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिकेने नागरिकांकडून वसूल केलेला १२०० कोटींचा अतिरिक्त कराचा प्रश्न उपस्थित केला. हा कर बिल्टअप एरियावर आकारण्यात आला, पण तो कार्पेेट एरियावर आकारायला हवा होता. उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे चालू वर्षापासून तो कार्पेट एरियावर आकारला जात असला तरी पाच वर्षांत आकारलेल्या अतिरिक्त कराचे काय, असा सवाल भातखळकर यांनी केला. तर हा अतिरिक्त कर मुंबईकरांना परत करण्याची मागणी आशिष शेलार यांनीही उचलून धरली. एकीकडे राज्यमंत्री पाटील हे अतिरिक्त कराची रक्कम मुंबईकरांना परत करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देत होते, त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले लेखी उत्तर मात्र वेगळेच होते. मंत्र्यांमधील ही विसंगती पत्रकारांच्या लक्षात आली, पण प्रश्न विचारणारे आमदार मात्र अनभिज्ञ होते. (विशेष प्रतिनिधी)जादा एफएसआय घेतलागेल्या सहा वर्षांत मुंबई महापालिकेने डीसी रुल ३३(२४) अंतर्गत वाहनतळांसाठी दिलेला एफएसआय आणि प्रत्यक्ष तयार झालेले वाहनतळ आणि महापालिकेकडे हस्तांतरित झालेली वाहनतळे याचा स्टेटस् रिपोर्ट सरकार तयार करेल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी दिले. भाजपाच्या मनीषा चौधरी, आशिष शेलार यांनी प्रश्न विचारला होता. मुंबई महापालिकेने शहरात ३०, पूर्व उपनगरात १० व पश्चिम उपनगरात १९ अशा एकूण ६० बिल्डरांना जादा एफएसआय दिला. त्या मोबदल्यात ४२ हजार ६६४ वाहनांसाठी पार्किंगची सोय करून देणे अपेक्षित होते.