शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कराच्या प्रश्नावरून मंत्र्यांमध्ये विसंगती

By admin | Updated: July 15, 2015 00:33 IST

मुंबईकरांकडून महापालिकेने २०१० ते २०१५ या काळात वसूल केलेला १२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त कर परत करण्याची जोरदार मागणी मुंबईतील भाजपाच्या

मुंबई : मुंबईकरांकडून महापालिकेने २०१० ते २०१५ या काळात वसूल केलेला १२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त कर परत करण्याची जोरदार मागणी मुंबईतील भाजपाच्या आमदारांनी केली. याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे उत्तर नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले खरे; परंतु मुंबईकरांकडून जास्त रक्कम घेतलीच नव्हती, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात केल्याने मंत्र्यांची चांगलीच फजिती झाली.भाजपाचे अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिकेने नागरिकांकडून वसूल केलेला १२०० कोटींचा अतिरिक्त कराचा प्रश्न उपस्थित केला. हा कर बिल्टअप एरियावर आकारण्यात आला, पण तो कार्पेेट एरियावर आकारायला हवा होता. उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे चालू वर्षापासून तो कार्पेट एरियावर आकारला जात असला तरी पाच वर्षांत आकारलेल्या अतिरिक्त कराचे काय, असा सवाल भातखळकर यांनी केला. तर हा अतिरिक्त कर मुंबईकरांना परत करण्याची मागणी आशिष शेलार यांनीही उचलून धरली. एकीकडे राज्यमंत्री पाटील हे अतिरिक्त कराची रक्कम मुंबईकरांना परत करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देत होते, त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले लेखी उत्तर मात्र वेगळेच होते. मंत्र्यांमधील ही विसंगती पत्रकारांच्या लक्षात आली, पण प्रश्न विचारणारे आमदार मात्र अनभिज्ञ होते. (विशेष प्रतिनिधी)जादा एफएसआय घेतलागेल्या सहा वर्षांत मुंबई महापालिकेने डीसी रुल ३३(२४) अंतर्गत वाहनतळांसाठी दिलेला एफएसआय आणि प्रत्यक्ष तयार झालेले वाहनतळ आणि महापालिकेकडे हस्तांतरित झालेली वाहनतळे याचा स्टेटस् रिपोर्ट सरकार तयार करेल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी दिले. भाजपाच्या मनीषा चौधरी, आशिष शेलार यांनी प्रश्न विचारला होता. मुंबई महापालिकेने शहरात ३०, पूर्व उपनगरात १० व पश्चिम उपनगरात १९ अशा एकूण ६० बिल्डरांना जादा एफएसआय दिला. त्या मोबदल्यात ४२ हजार ६६४ वाहनांसाठी पार्किंगची सोय करून देणे अपेक्षित होते.