शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

आरोग्य राज्यमंत्र्यांनी कोरोनाचा प्रसाद अनेकांना दिला; जयंत पाटील यांची कोपरखळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 07:45 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही लोक काळजी घेत नाहीत, असे सांगताना जयंत पाटील यांनी यड्रावकर-पाटील यांचेच उदाहरण दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कोरोना होऊन गेल्याचे कळलेही नाही. त्यांनी अनेकांना प्रसाद दिला असेल, अशी कोपरखळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मारली. सांगलीत दक्षिण भारत जैन सभेतर्फे सुरू केलेल्या कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वत: राज्यमंत्री यड्रावकर-पाटील या वेळी उपस्थित होते.

कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही लोक काळजी घेत नाहीत, असे सांगताना जयंत पाटील यांनी यड्रावकर-पाटील यांचेच उदाहरण दिले. ते म्हणाले, आरोग्य राज्यमंत्र्यांना कोरोना होऊनदेखील गेला, पण त्यांना कळालेच नाही. त्यांच्या स्वीय सहायकाला, वाहनाच्या चालकालाही कोरोनाचा संसर्ग झाला. पण समजलेच नाही. यादरम्यान त्यांनी अनेकांना प्रसाद वाटला असेल.

या त्यांच्या टिप्पणीला खुद्द यड्रावकर-पाटील यांनीही हसून दाद दिली. यड्रावकर-पाटील म्हणाले, कोरोनाविरोधात लढ्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी डॉक्टर व प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत.

कोरोना टाळायचा तर मास्कचा वापर, हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे, ही त्रिसूत्री पाळायलाच हवी. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील नियमांचे काटेकोर पालन करतात. अंतर राखून संवाद साधतात. त्यामुळे तुम्ही-आम्हीदेखील हे पथ्य पाळायलाच हवे. नेत्यांना कडेवर घ्यायची सवय बंद करायला हवी.जयंत पाटील, जलसंपदामंत्री

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील