शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

कृषी राज्यमंत्र्यांची वसई तालुक्यात धावती भेट, शेतकऱ्यांसोबत संवाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 23:04 IST

शेतकरी नाराज : शेतकऱ्यांसोबत संवाद नाही

पारोळ : पावसामुळे भात शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी पालघर जिल्ह्यात आलेले कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वसई तालुक्यातील कोपर या गावी धावती भेट दिली. मात्र, शेतकऱ्यांशी न बोलता वसईचा हा पाहणी दौरा त्यांनी अवघ्या १० मिनिटात आटोपला. पण आपल्या समस्या मांडण्यासाठी जास्त वेळ न दिल्याने शेतकरी नाराज झाले.

कोपर गावातील किशोर किणी यांनी शेतीच्या पंचनाम्याला तारखेची मुदत न ठेवता वसई तालुक्यातील शेवटच्या शेतकºयाचाही पंचनामा झाला पाहिजे अशी विनंती केली आणि कृषीराज्यमंत्री खोत यांनी याबाबत संबंधित अधिकाºयांना सूचना केल्या.राज्यात परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकºयांवर संकट कोसळले. या भात शेतीच्या नुकसानी पाहणी करण्यासाठी कृषीराज्य मंत्री पालघर जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. त्यांनी वसई तालुक्यातील कोपर या गावात भात पीक नुकसानीची पाहणी केली. ते पाच वाजता शिरसाड येथे वसईतील शेतकरी यांच्याशी संवाद साधणार आहेत, असे मेसेज सर्व शेतकºयांना पाठवले होते. त्यासाठी काही शेतकरी शिरसाड तलाठी कार्यालयात थांबले होते. मात्र, कृषीराज्यमंत्र्यांनी नियोजित वेळेच्या आतच कोपर गावाला भेट देत आपला दौरा आटोपता घेतला. त्यामुळे शिरसाड येथे जमलेल्या शेतकºयांची निराशा झाली. कृषी राज्यमंत्र्यांनी आमच्या गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. पण त्यांनी संवाद साधला असता तर आम्ही शेतीबाबत अडचणी मांडल्या असत्या, असे सदानंद किणी यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSadabhau Khotसदाभाउ खोत