शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यात पुराचं थैमान; मदत, पुनर्वसनमंत्री पक्षाच्या बैठकीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:03 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे होते. परंतु, यामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचाच पत्ता नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई - पश्चिम महाराष्ट्रात महापुराने हाहाकार केला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराची सर्वाधिक झळ बसली आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक संस्था, संघटना समोर येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त परिसराची पाहणी केली. मात्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख मंत्रालयातूनच परिस्थितीचा आढावा घेत असून पक्षाच्या बैठकीत व्यस्त आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे होते. परंतु, यामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचाच पत्ता नव्हता. मदत आणि पुनर्वसन मंत्री देशमुख पुण्यात शक्ती केंद्राच्या बैठकीत हजर होते, असंही समजते. राज्यात पुराने हाहाकार लावला असताना मंत्री मात्र पक्षाच्या बैठकीत व्यस्त असल्याचे चित्र आहे. 

यावर सुभाष देशमुख यांनी आपली बाजू मांडली असून आपण केवळ बैठकीला गेलो नव्हतो. परंतु, जाता-जाता कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यासाठी आपण पक्षाच्या बैठकीत डोकावयाला गेलो होतो, असंही देशमुख यांनी सांगितले.  

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील अनेक नेते प्रत्यक्ष मदत करताना दिसत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्यांच्या पत्नी शैलजा पाटील, काँग्रेसनेते विश्वजीत कदम, बंटी पाटील पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांना मदत करताना दिसून आले. मात्र मदत आणि पुनर्वसनमंत्र्यांकडून बैठकांचा धडका सुरू आहे. वास्तविक पाहता ग्रावउंड पातळीवर

दरम्यान सुभाष देशमुख यांच्या फेसबुक पेजवरच राज्यातील पुरस्थितीचा आढावा मंत्रालयातून घेत असल्याचे नमूद करण्यात आले. पुरग्रस्त भागात अत्यावश्यक सुविधा पोहचविण्यात यश येत असल्याचे त्यांच्या पेजवर म्हटले आहे. प्रत्यक्षात हजारो नागरिक अजुनही पुरात अडकलेले आहेत.