शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

मंदिर, मशिदीसह राजकीय नेत्यांचेही भोंगे बंद करा; राज्यमंत्री बच्चू कडूंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 10:22 IST

मूळ मुद्दे बाजूला सारून वेगळे मुद्दे मांडले जात आहे. भोंगे बंद करायचे असेल तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजे असं बच्चू कडूंनी सांगितले.

अमरावती – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केल्यानंतर राज्यात वादंग निर्माण झाला. अनेक मुस्लीम संघटनांनी राज ठाकरेंच्या विधानाचा विरोध केला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या हेतूने भोंग्याचे राजकारण केले जात आहे असा आरोप मविआ नेते करत आहे. त्यामुळे राज्यात भोंग्यांचे राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.

यातच राज्यमंत्री बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनी भोंग्यांच्या राजकारणावर भाष्य करत मंदिर, मशिदीसह निवडणुकीतील राजकीय नेत्यांचेही भोंगे बंद करा अशी मागणी केली आहे. बच्चू कडू म्हणाले की, राजकीय नेत्यांचे निवडणूकीत भोंगेही बंद करा. दोन वर्षे कोरोनामुळे सर्व मंदिर,बौद्ध विहार,मशिदी मधील भोंगे बंद होते त्यावेळी फक्त रुग्णवाहिकेवरचा भोंगा सुरू होता. देशात सध्या काय परिस्थिती आहे. मूळ मुद्दे बाजूला सारून वेगळे मुद्दे मांडले जात आहे. भोंगे बंद करायचे असेल तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजे. निवडणूकीत राजकीय लोकांचे भोंगे बंद करून भोंगा नावाचा शब्दच बंद करावा असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.

संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने एमआयएमच्या ओवेसींचा वापर केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात हिंदू समाजात काही औवेसी निर्माण करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात फूट पाडण्याचे, दंगली घडविण्याचे आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते खा. संजय राऊत(Sanjay Raut) यांनी करत राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

राऊत म्हणाले की, नवहिंदू औवेसींच्या माध्यमातून भाजप हे काम करवून घेत आहे. मात्र, राऊत यांनी थेट राज ठाकरेंचं नाव घेण्याचे टाळले. हे मी कोणाचे व्यक्तिगत नाव घेऊन बोलत नाही. महाराष्ट्रातील औवेसींच्या माध्यमातून प्रयत्न आहेत परंतु महाराष्ट्राची जनता अत्यंत सावध आहे, जागरूक आहे, संयमी आहे आणि ज्ञानी आहे, एवढेच मी सांगेन. देशभरातील दंगलीचा व्यापक कट आहे आणि जे दिल्लीत घडले ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. परंतु यशस्वी होणार नाहीत, असंही राऊत म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBacchu Kaduबच्चू कडू