शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

किमान वीज वापरात करा सिंचन

By admin | Updated: January 13, 2017 02:01 IST

येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनाच किमान वीज वापरात सिंचन करावे लागणार आहे. या भागात त्याचीच माहिती घेऊया...

सध्या शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात व अखंडित वीजपुरवठा होणे ही मोठी कसरत आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी असूनही केवळ विजेअभावी पिके जळाल्याची उदाहरणे आहेत. महावितरणने कितीही ठरवले तरी पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणे अशक्य आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनाच किमान वीज वापरात सिंचन करावे लागणार आहे. या भागात त्याचीच माहिती घेऊया...किमान वीज वापरून सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांना काही बदल करावे लागतील. पाईपलाईन रचना : आपले किती क्षेत्र सिंचनाखाली आहे. वीज किती तास मिळणार, पाण्याची उपलब्धता किती, त्यावर कोणत्या सीझनमध्ये आपण काय पिके घेणार या सर्वांचा विचार करुन पाईपलाईनची रूंदी ठरवावी तसेच ती किती लांब व उंच न्यायची त्याचा विचार करून योग्य तेथे हवा काढण्यास व्हॉल्व्ह, नॉन रिटर्न व्हॉल्व्ह बसवावेत. पाईपलाईन टाकताना ती शक्यतो सरळ असावी. त्यामुळे लांबी कमी होऊन खर्च तर वाचतोच पण सरळ गेल्याने कमी विजेत पाणी जास्त दाबाने जाते. पाईपलाईनवर डावे- उजवे फाटे काढायचे असतील तर ते काटकोनात न काढता वक्राकार बेंड वापरावेत.वीजपंपाची निवड : तज्ज्ञांचा सल्ला घेवून शक्यतो पाण्यातील पंप निवडावा. म्हणजे विहिरीच्या पाण्याची पातळी खाली गेली तरी शेवटपर्यंत पाणी उपसता येईल. जमिनीवरची मोटार वापरली तर पाण्यापासून मोटारीपर्यंत पाणी पोहोचायचे काम हवेच्या दाबाकडून होत असल्याने जसजसे पाणी खाली जाते तशी वीज खर्च होऊनही पाणी मात्र कमी मिळते. टाकी उंचावर हवी : ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर जास्त आहे. ते शेतकरी काही वेळा पाईपलाईनमधील जास्तीचे पाणी परत उद्भवात टाकण्यासाठी किंवा दाब येऊ नये म्हणून बायपास यंत्र बसवतात. यात जास्तीचे पाणी परत उ्भवतात सोडले जात असल्याने विजेचा अपव्यय होतो . त्याऐवजी शेताच्या वेगवगळ्या तुकड्यांत पाणी वापरुन झाल्यावर शेवटच्या अधिक उंचीच्या भागात शेततळे अथवा मोठी टाकी बांधावी. त्यात हे जास्तीचे पाणी साठवावे. त्याने विजेची बचत होतेच पण जेव्हा वीज जाते तेव्हा त्या उंचावर साठविलेल्या जास्तीच्या पाण्याचा उपयोग होतो. वेगवेगळ्या आकाराची वळणे : पाईपच्या कंपन्या पूर्वी पाईपलाईनचे व्हॉल्व किंवा टी तयार करताना शक्यतो काटकोनातच करायचे. अलिकडे काही कंपन्यांनी गरजेनुसार ९०, १२०, १४० अंश अशा पाहिजे त्या वळणात हे जोड बनवले आहेत. एकदा ९० डिग्रीच्या कोनात वळवून पुन्हा वळत जाणाऱ्या पाईपलाईनमुळे पाणी वाहताना जास्त प्रतिरोध होतो. त्यातून कमी पाणी मिळते व वीजही जास्त वापरली जाते. त्यामुळे काटकोणाऐवजी वळणदार व्हॉल्वचा वापर करावा. शिवाय पाईपचे जॉईंट कमी अधिक आकाराचे न वापरता पाईपच्या आकाराचेच वापरावेत. फिल्टरचा आकार : बरेच शेतकरी सँड फिल्टर वापरण्याऐवजी पाईपलाईनच्या रूंदीचेच स्किन फिल्टर वापरतात. तेही बहूदा ठिबकच्या शेवटी असते. त्यामुळे येणाऱ्या पाण्याला कमी रुंदीच्या स्क्रिन फिल्टरमधील जाळीचा अडथळा येवून कमी पाणी बाहेर पडते व मागच्या सर्व लाईनवर अनाश्यक दाब राहतो. म्हणून ३ इंची पाईपलाईनवर ४ इंची फिल्टर बसवावा, तसेच जेव्हा त्याच पाईपलाईनमधून प्रवाही पध्दतीने पाणी द्यायचे तेव्हा फिल्टरमधील जाळी काढून टाकावी तसेच ती वारंवार स्वच्छ व योग्यवेळी बदलावी. तसेच मुख्य पाईपलाईनवर वेगवेगळ्या शेतात किंवा शेतपट्ट्यात बारी काढतानाही उंच न काढता शक्यतो जमिनीपासून फक्त ६ इंचावर असावीत. लहान हौदाचा वापर : काही शेतकरी लवणातील विहिरीचे पाणी लांबच्या उंचावरील विहिरीत साठवून ठेवतात. परंतु विहिरीत साठवलेले पाणी खडकात  जिरते. त्यामुळे उंचावरील जमीनीवरच एखादे लहान शेततळे किंवा सिमेंटचा हौंद बांधून त्यात पाणी साचावे. नंतर ते हवे तसे ठिंबक, तुषार सिंचनासाठी वापरता येऊ शकते. याच पद्धतीचा शेतकऱ्यांनी वापर केला तर थेंब थेंब पाणी तर वाचेलच, पण विजेच्या प्रत्येक युनिटचीही बचत होईल.  - प्रा. बी. एन. शिंदे -