शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

किमान वीज वापरात करा सिंचन

By admin | Updated: January 13, 2017 02:01 IST

येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनाच किमान वीज वापरात सिंचन करावे लागणार आहे. या भागात त्याचीच माहिती घेऊया...

सध्या शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात व अखंडित वीजपुरवठा होणे ही मोठी कसरत आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी असूनही केवळ विजेअभावी पिके जळाल्याची उदाहरणे आहेत. महावितरणने कितीही ठरवले तरी पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणे अशक्य आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनाच किमान वीज वापरात सिंचन करावे लागणार आहे. या भागात त्याचीच माहिती घेऊया...किमान वीज वापरून सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांना काही बदल करावे लागतील. पाईपलाईन रचना : आपले किती क्षेत्र सिंचनाखाली आहे. वीज किती तास मिळणार, पाण्याची उपलब्धता किती, त्यावर कोणत्या सीझनमध्ये आपण काय पिके घेणार या सर्वांचा विचार करुन पाईपलाईनची रूंदी ठरवावी तसेच ती किती लांब व उंच न्यायची त्याचा विचार करून योग्य तेथे हवा काढण्यास व्हॉल्व्ह, नॉन रिटर्न व्हॉल्व्ह बसवावेत. पाईपलाईन टाकताना ती शक्यतो सरळ असावी. त्यामुळे लांबी कमी होऊन खर्च तर वाचतोच पण सरळ गेल्याने कमी विजेत पाणी जास्त दाबाने जाते. पाईपलाईनवर डावे- उजवे फाटे काढायचे असतील तर ते काटकोनात न काढता वक्राकार बेंड वापरावेत.वीजपंपाची निवड : तज्ज्ञांचा सल्ला घेवून शक्यतो पाण्यातील पंप निवडावा. म्हणजे विहिरीच्या पाण्याची पातळी खाली गेली तरी शेवटपर्यंत पाणी उपसता येईल. जमिनीवरची मोटार वापरली तर पाण्यापासून मोटारीपर्यंत पाणी पोहोचायचे काम हवेच्या दाबाकडून होत असल्याने जसजसे पाणी खाली जाते तशी वीज खर्च होऊनही पाणी मात्र कमी मिळते. टाकी उंचावर हवी : ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर जास्त आहे. ते शेतकरी काही वेळा पाईपलाईनमधील जास्तीचे पाणी परत उद्भवात टाकण्यासाठी किंवा दाब येऊ नये म्हणून बायपास यंत्र बसवतात. यात जास्तीचे पाणी परत उ्भवतात सोडले जात असल्याने विजेचा अपव्यय होतो . त्याऐवजी शेताच्या वेगवगळ्या तुकड्यांत पाणी वापरुन झाल्यावर शेवटच्या अधिक उंचीच्या भागात शेततळे अथवा मोठी टाकी बांधावी. त्यात हे जास्तीचे पाणी साठवावे. त्याने विजेची बचत होतेच पण जेव्हा वीज जाते तेव्हा त्या उंचावर साठविलेल्या जास्तीच्या पाण्याचा उपयोग होतो. वेगवेगळ्या आकाराची वळणे : पाईपच्या कंपन्या पूर्वी पाईपलाईनचे व्हॉल्व किंवा टी तयार करताना शक्यतो काटकोनातच करायचे. अलिकडे काही कंपन्यांनी गरजेनुसार ९०, १२०, १४० अंश अशा पाहिजे त्या वळणात हे जोड बनवले आहेत. एकदा ९० डिग्रीच्या कोनात वळवून पुन्हा वळत जाणाऱ्या पाईपलाईनमुळे पाणी वाहताना जास्त प्रतिरोध होतो. त्यातून कमी पाणी मिळते व वीजही जास्त वापरली जाते. त्यामुळे काटकोणाऐवजी वळणदार व्हॉल्वचा वापर करावा. शिवाय पाईपचे जॉईंट कमी अधिक आकाराचे न वापरता पाईपच्या आकाराचेच वापरावेत. फिल्टरचा आकार : बरेच शेतकरी सँड फिल्टर वापरण्याऐवजी पाईपलाईनच्या रूंदीचेच स्किन फिल्टर वापरतात. तेही बहूदा ठिबकच्या शेवटी असते. त्यामुळे येणाऱ्या पाण्याला कमी रुंदीच्या स्क्रिन फिल्टरमधील जाळीचा अडथळा येवून कमी पाणी बाहेर पडते व मागच्या सर्व लाईनवर अनाश्यक दाब राहतो. म्हणून ३ इंची पाईपलाईनवर ४ इंची फिल्टर बसवावा, तसेच जेव्हा त्याच पाईपलाईनमधून प्रवाही पध्दतीने पाणी द्यायचे तेव्हा फिल्टरमधील जाळी काढून टाकावी तसेच ती वारंवार स्वच्छ व योग्यवेळी बदलावी. तसेच मुख्य पाईपलाईनवर वेगवेगळ्या शेतात किंवा शेतपट्ट्यात बारी काढतानाही उंच न काढता शक्यतो जमिनीपासून फक्त ६ इंचावर असावीत. लहान हौदाचा वापर : काही शेतकरी लवणातील विहिरीचे पाणी लांबच्या उंचावरील विहिरीत साठवून ठेवतात. परंतु विहिरीत साठवलेले पाणी खडकात  जिरते. त्यामुळे उंचावरील जमीनीवरच एखादे लहान शेततळे किंवा सिमेंटचा हौंद बांधून त्यात पाणी साचावे. नंतर ते हवे तसे ठिंबक, तुषार सिंचनासाठी वापरता येऊ शकते. याच पद्धतीचा शेतकऱ्यांनी वापर केला तर थेंब थेंब पाणी तर वाचेलच, पण विजेच्या प्रत्येक युनिटचीही बचत होईल.  - प्रा. बी. एन. शिंदे -