शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बोरीवलीत उभी राहते मिनी धारावी! दिवसा ढवळ्या उभारल्या 60 ते 70 पक्क्या झोपड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 19:46 IST

बोरीवली पश्चिम भिमनगर गल्ली नं ३ च्या पाठीमागे नाल्यामध्ये भरणी टाकून सुमारे 60 ते 70 पक्क्या नवीन अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम सध्या येथे राजरोसपणे सुरू चालू आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: एकीकडे दहिसर पश्चिम गणपत पाटील नगर मध्ये गेल्या दशकात मिनी धारावी वसली असतांना, आता बोरीवलीच्या पश्चिमेला नाल्यात सरकारी जागेवर मिनी धारावी उभी राहत आहे. बोरीवली पश्चिम भिमनगर गल्ली नं ३ च्या पाठीमागे नाल्यामध्ये भरणी टाकून सुमारे 60 ते 70 पक्क्या नवीन अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम सध्या येथे राजरोसपणे सुरू चालू आहे.  

बोरिवलीच्या भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा रेश्मा निवळे आणि नगरसेविका अंजली खेडकर यांच्याकडे  यासंदर्भात वारंवार तक्रारी येत होत्या. त्यांनी काल स्ट्रिंग ऑपरेशन करून धाडसाने घटनास्थळी धाव घेतली आणि सदर बांधकाम रोखले.

सदर बाब त्यांनी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि बोरिवली विधानसभा क्षेत्राचे  आमदार  सुनील राणे यांना सांगताच त्यांनी सदर जागेची पाहणी करण्याची सूचना केली तसेच पालिका अधिकाऱ्यांना सूद्धा सूचित केले.

याठिकाणी रेश्मा निवळे, नगरसेविका अंजली खेडकर  गेल्यावर जवळजवळ ६० ते ७० पक्क्या  झोपड्या तयार  तयार झाल्याचे व अजूनही नाल्यात भरणी टाकत असल्याचे त्यांनी दिसून आले. त्या दोघींनी जोरदार विरोध करुन सदर काम थांबवले. तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी येथे बनत असलेल्या मिनी धारावीचा आखो देखा का हाल पेश केला.

याप्रकरणी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, जर खाजगी जागेवर 2 फूट बांधकाम केले तर महापालिका ते तोडते आणि मग सरकारी जागेवर राजरोसपणे उभ्या राहणाऱ्या झोपड्यांकडे महापालिका मात्र दुर्लक्ष करते. यावरून नागरिकांनी काय ते समजून जावे असा टोला त्यांनी लगावला.

याप्रकरणी आमदार सुनील राणे यांच्याशी संपर्क साधल्यावर,पूर्वी चार बाबू आणि त्यावर ताडपत्री टाकून उभारलेली झोपडी असे म्हंटले जात होते,मात्र या ठिकाणी विटांचे  सरकारी जागेवर पक्के बांधकाम करून झोपड्या उभ्या राहतात. याकडे पालिका प्रशासन,तलाठी व उपनगर जिल्ह्याधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्यांनी दुर्लक्ष केले आहे.उद्या जर येथे दुर्घटना घडल्यास आणि पूरर्जन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कोण जबाबदार असा सवाल त्यांनी केला.

याप्रकरणी झोपडपट्टी दादांवर एमआरटीपी लावून गून्हा दाखल करावा व सदर बांधकाम ताबडतोब निष्कासित करावे असे आपण आर मध्य वॉर्डच्या  वार्ड आफिसर डॉ. भाग्यश्री कापसे यांना कळवले आहे.  पालिका अधिकाऱ्यांचा वरदहस्त मिळाल्यानेच सदर पक्की बांधकामे येथे सुरू असून गोराई चारकोप येथील पाणी या अनधिकृत झोपड्यांना पूरवले जाते. त्यामूळेच चारकोप गोराई म्हाडा सोसायट्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागते असे मत त्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Mumbaiमुंबईborivali-acबोरिवली