शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

कोट्यवधींचे बियाणे व्यापार्‍यांकडे पडून !

By admin | Updated: July 11, 2014 00:41 IST

अकोला जिल्ह्यात पेरण्या लांबल्या: शेतकर्‍यांची बियाणे खरेदीकडे पाठ

अकोला: वर्‍हाडात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश स्थितीचा फटका शेतकर्‍यांसोबतच कृषिसेवा केंद्रांनाही बसला आहे. पावसाअभावी सर्व व्यवहार ठप्प पडले असून, बाजारपेठेत स्मशान शांतता पसरली आहे. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीकडे पाठ फिरविली असून, परिणामी कृषिसेवा केंद्रांचे कोट्यवधी रुपयांचे बियाणे पडून आहे. जुलै महिना सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी वर्‍हाडात पावसाने हजेरी लावली नाही. गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडला. तो सावत्रिक नसल्याने पेरण्या होणे शक्य नाही. याचा प्रभाव कृषी बाजारपेठेवर मोठय़ा प्रमाणात पडला आहे. व्यापार्‍यांनी व कृषिसेवा केंद्र संचालकांनी विक्रीसाठी कोट्यवधीचे बियाणे व खते खरेदी करून ठेवले आहे; मात्र पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांनी बियाणे व खत खरेदीकडे पाठ फिरविली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकर्‍यांनी बियाण्यांची खरेदी केली होती. त्यावेळी बाजारपेठेत वर्दळ होती. आता मात्र शेतकरी पावसाचा रागरंग पाहता हात आवरता घेताना दिसत आहे. यावर्षी जिल्हा कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामात पेरणीसाठी ७५ हजार ८४ क्विंटल सोयाबिन बियाण्यांची मागणी केली होती. त्यापैकी विविध कंपन्यांकडून ६६ हजार ७९ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. उपलब्ध बियाण्यांपैकी ५२ हजार ५९४ क्विंटल बियाण्यांचीच शेतकर्‍यांनी खरेदी केली आहे. १३ हजार ४८५ क्विंटल बियाणे कृषिसेवा केंद्रांकडे पडून आहे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या पाच लाख बॅग्सची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ६ लाख १६ हजार ४१२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला. आतापर्यंत केवळ ४ लाख ७३ हजार क्विंटल बियाण्यांचीच विक्री झाली असून, २ लाख १६ हजार ३३९ क्विंटल बियाणे शेतकर्‍यांकडे पडून आहेत. ** दोन हजार रुपये किलोचे बियाणे विकावे लागणार तीन हजार रुपये क्विंटलने न विकल्या गेलेले कपाशी, मुग, उडिदाचे बियाणे कंपन्या परत घेतात; मात्र सोयाबिनचे बियाणे परत घेत नाहीत. त्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होणार असून, २२५0 रुपये किलो असलेले बियाणे त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन हजार रुपये क्विंटलने सोयाबीनच्या भावात विकावे लागणार आहे. ** कृषिसेवा केंद्र मालकांना जबर फटका कृषिसेवा केंद्रांकडे सध्या १३ हजार ४८५ क्विंटल सोयाबीनचे बियाणे पडून आहे. हे बियाणे जवळपास ४0 कोटी रुपयांचे असून, शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याने व्यापार्‍यांना हे बियाणे कृषि उत्पन्न बाजार समितीत विकावे लागणार आहे. अनेक दुकानदार पाचशे ते सहाशे रुपये कमी भावाने बियाण्यांची विक्री करीत आहेत. तसेच कपाशीच्या बियाण्यांची विक्री झाली नसल्यामुळेही व्यापार्‍यांचे नुकसान झाले आहे. आता हे बियाणे मूळ किंमतीतच कंपनीला परत करावे लागणार आहेत.