शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

दूध, भाज्या रस्त्यांवरच

By admin | Updated: June 6, 2017 06:37 IST

संपकरी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संपकरी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई वगळता राज्यातील बहुतांश बाजारपेठा बंद असल्याने शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णत: ठप्प झाले. तर आंदोलकांनी जागोजागी रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. जाळपोळीच्या किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला. मात्र ३०७ बाजार समित्यांपैकी ३०० मध्ये व्यवहार सुरू होता, असा दावा सरकारने केला आहे.१ जूनपासून संपावर असलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले अल्पभूधारकांच्या कर्जमाफीसह इतर निर्णय अमान्य करत ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेला राज्यातील शेतकरी, शेतमजूर, अडते, व्यापारी व दूध संकलकांनी चांगला प्रतिसाद दिला. संपाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला होता. कोल्हापुरात दूध व भाजीपाल्याची आवक-जावक पूर्णपणे ठप्प झाली. ‘गोकुळ’, ‘स्वाभिमानी’, ‘वारणा’ दूध संघाचे साडेबारा लाख लीटर दूध संकलन न झाल्याने सुमारे सहा कोटींचा फटका बसला आहे. साताऱ्यात राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळीची घटना घडली. टायर पेटविण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली. खान्देशात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, तर धुळे येथे रास्ता रोको करणाऱ्या १५० जणांना पोलिसांनी अटक केली. अहमदनगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातही बंदला प्रतिसाद मिळाला. नगर जिल्ह्यातील सर्व व्यापारपेठा बंद होत्या. तर पुणे शहर वगळता जिल्ह्यात बंद पाळण्यात आला.शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथे रास्ता रोको आंदोलनानंतर पाच बसना लक्ष्य करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलकांनी ५ बसचे नुकसान केले़, तर आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) येथे वाहनावर दगडफेक केली. हे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला.विदर्भात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रामटेकमध्ये मात्र बंद दरम्यान झालेल्या हिंसक घटनेने गालबोट लागले. रामटेक शहरात भाजपा व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हॉटेल बंद करण्यावरून वाद झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. दरम्यान, राज्यभरातील ३०७ बाजार समित्यांपैकी ३०० बाजार समित्यांमध्ये व्यवहार झाले असून शेतकऱ्यांच्या आडून राजकीय पक्षांनीच या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत मोर्चा, दगडफेक, कृषीमालाची नासधूस, जाळपोळ आदी कृत्य केले, असा दावा सरकारने केला आहे. कुणी कुठे आंदोलने केली त्याची यादीच प्रसारमाध्यमांना देण्यात आली असून त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांची नावे आहेत.>नवी सुकाणू समितीशेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नवी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये शेती अर्थतज्ज्ञ गिरधर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, डॉ. बुधाजीराव मुळीक, रघुनाथदादा पाटील, आ. बच्चू कडू, विजय जावंधिया, कॉ. अजित नवले, राजू देसले, गणेश काका जगताप, चंद्रकांत बनकर, एकनाथ बनकर, शिवाजी नाना नानखिले, गणेश कदम, करण गायकर, हंसराज वडघुले, अनिल धनवट आदी २१ जणांचा समावेश आहे. -वृत्त/४ंमंत्री म्हणाले, स्वामीनाथन हे तर अभिनेते!जागतिक पातळीवर शेती संशोधक म्हणून ख्याती असलेल्या स्वामीनाथन यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘दक्षिणात्य अभिनेता’ म्हटल्याने शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला. मंत्र्यांस स्वामीनाथन माहिती नाहीत, याची लाज वाटते, अशा शब्दांत किसान सभेने रोष व्यक्त केला.आंदोलन आणि संपाच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे पाप विरोधी पक्ष करीत आहेत. खऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला आम्ही सदैव तयार आहोत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. या सरकारला पाठिंबा दिल्याचा आपल्याला मोठा पश्चात्ताप होत आहे. आता लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.

>एक किलोमीटर लांबीचे हमीपत्र

‘कर्जमाफी केली तर, शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी देता का,’ असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात विरोधकांना विचारला होता. मुख्यमंत्र्यांच्या या प्रश्नाला उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडीतील शेतकऱ्यांनी उत्तर दिले असून ‘कर्जमाफी द्या, आत्महत्या करणार नाही’ अशी ग्वाही देणारे तब्बल एक किलोमीटर लांबीचे ‘हमीपत्र’ मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.