शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
3
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
4
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
5
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
6
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
7
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
9
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
10
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
12
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
13
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
14
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
15
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
16
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
17
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
18
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
19
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
20
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चेकऱ्यांना सरकारकडून कारवाईचे सकारात्मक संकेत मिळतील- रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 14:01 IST

मोर्चानंतर सरकारकडून मोर्चेकऱ्यांना कारवाईचे सकारात्मक संकेत मिळतील, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हंटलं आहे

ठळक मुद्दे मोर्चानंतर सरकारकडून मोर्चेकऱ्यांना कारवाईचे सकारात्मक संकेत मिळतील, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हंटलं आहे मराठा समाजाकडून आजपर्यंत विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. पण प्रत्येक वेळी फक्त आश्वासनावर समाधान मानावं लागतं आहे, अशी प्रतिक्रिया मोर्चातील सहभागी लोकांकडून व्यक्त केली जाते आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन देतील आणि यातून यंदा नक्कीच सकारात्मक कारवाईचे संकेत मोर्चेकरूंना मिळतील.

मुंबई, दि. 9- मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मुंबईतून भव्य मराठा क्रांती मोर्चा निघाला आहे. या मोर्चाला लाखोंच्या संख्येने लोकांनी हजेरी लावली आहे. मोर्चातील शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं जाणार आहे. मराठा मोर्चाच्या मागणीवर सरकार सकारात्मक आहे, तसंच या मोर्चानंतर सरकारकडून मोर्चेकऱ्यांना कारवाईचे सकारात्मक संकेत मिळतील, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हंटलं आहे. मराठा समाजाकडून आजपर्यंत विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. पण प्रत्येक वेळी फक्त आश्वासनावर समाधान मानावं लागतं आहे, अशी प्रतिक्रिया मोर्चातील सहभागी लोकांकडून व्यक्त केली जाते आहे. यावरच रावसाहेब दानवेंनी उत्तर दिलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन देतील आणि यातून यंदा नक्कीच सकारात्मक कारवाईचे संकेत मोर्चेकरूंना मिळतील, असं दानवे म्हणाले आहेत.

मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली होती. यावरही दानवेंनी उत्तर दिलं. आशिष शेलारांना धक्काबुक्की झाली नसल्याचं ते म्ङणाले. 'विधानसभेत जाऊन तुम्ही मराठा आरक्षणाची भूमिका मांडा. तिथं तुमचं काम करा. इथं येऊ नका. इथं यायचंच असेल तर काहीतरी ठोस आश्वासन घेऊन या, असं मोर्चेकरूंनी आशिष शेलार यांना सांगितल्याची माहिती मिळते आहे. आशिष शेलार यांनीही धक्काबुक्की झाल्याचं वृत्त नाकारलं.मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा मोर्चे निघत आहेत. आतापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांत निघालेल्या मोर्चांपासून राजकीय नेत्यांना दूर ठेवण्यात आलं आहे. तसंच कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण मोर्च्यात झालेलं नाही. त्यामुळेच आशिष शेलार यांना आज आझाद मैदानात येण्यापासून रोखलं गेलं असावं, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

राज्य सरकार घेणार मोठा निर्णयआज निघालेल्या भगव्या वादळापुढे सरकार नरमलं आहे. तब्बल 57 मोर्चे काढूनसुद्धा मराठा समाजाच्या मागणीकडे रीतसर दुर्लक्ष केल्याने आता या भगव्या वादळाचा मूक हुंकार राजधानीत गुंजतो आहे. या मराठा मूक आक्रोशासमोर सरकर नरमले आहे आणि ४ निर्णय तातडीने घेण्यात आले आहेत. यामध्ये मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करणार, समितीला कॅबिनेट दर्जा देणार, समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज राहणार नाही. हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, राज्य मागास आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या EBC मार्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्के करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणार, असे निर्णय झाले आहेत. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा