शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

माध्यान्ह भोजनापूर्वी मुलांना दूध देणार

By admin | Updated: July 12, 2015 02:27 IST

शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनापूर्वी दोन तास अगोदर सकस दूध देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे मत माध्यान्ह भोजन योजनेचे केंद्रीय संचालक

औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनापूर्वी दोन तास अगोदर सकस दूध देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे मत माध्यान्ह भोजन योजनेचे केंद्रीय संचालक गया प्रसाद यांनी येथे व्यक्त केले.केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारतर्फे संयुक्त विद्यमाने शनिवारी माध्यान्ह भोजनासंबंधी एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा झाली. शालेय पोषण आहार योजना विविध राज्यांमध्ये कशा प्रकारे राबवली जाते, याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर विवेचन केले. प्रामुख्याने महाराष्ट्रात ही योजना उत्कृष्ट पद्धतीने राबवली जात असल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या शालेय पोषण आहार योजनेत काही राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना दुधाचाही पुरवठा केला जातो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमताही विकसित झाली पाहिजे, यासाठी मुलांना भोजन देण्यापूर्वी २ तास अगोदर सकस दूध देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.प्रधान सचिव नंदकुमार यांनी ही योजना राबवताना येणाऱ्या अडचणी शासनस्तरावरून तत्परतेने सोडविण्याची ग्वाही दिली. अशा उपक्रमांमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विविध राज्यांतील अधिकाऱ्यांनी योजनेसंबंधीचे अनुभव, निरीक्षण व त्रुटीबद्दल कार्यशाळेत ऊहापोह केला. (प्रतिनिधी)