शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मध्यमवयीन व्यक्तीला मिळाले ‘तरुण हृदय’

By admin | Updated: April 27, 2016 11:17 IST

हृदयाचा दुर्धर आजार असणाऱ्या राजस्थानातील ४३ वर्षीय पुरुषास उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आले होते.

मुंबई : हृदयाचा दुर्धर आजार असणाऱ्या राजस्थानातील ४३ वर्षीय पुरुषास उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीला सुरतमधील १७ वर्षीय तरुणाचे हृदय मिळाल्याने जीवनदान मिळाले आहे. सुरत ते मुंबई हे २९६ किमीचे अंतर अवघ्या १ तास १५ मिनिटांत कापून हृदय मुंबईत आणण्यात आले. राजस्थानातील अल्वर येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय पुरुषास डायलेटेड कार्डिओमायोपॅथी हा आजार झाला होता. या आजारात हृदयाच्या धमण्या घट्ट होतात. त्यामुळे हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण होतात. या आजारावर शेवटचा उपचार म्हणजे हृदय प्रत्यारोपण हा असतो. या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी उपचारासाठी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरतच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल झालेल्या १७ वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्या वेळी त्याच्या नातेवाइकांनी हृदय, मूत्रपिंड आणि यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चार जणांना जीवनदान मिळाले आहे. मुंबईत आणल्या गेलेल्या हृदयामुळे या ४३ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले आहे. चांगल्या प्रकारे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होत आहे. त्यामुळे अवयवदानाचा टक्का वाढतो आहे. अशाच पद्धतीने अवयवदान होत राहिल्यास गरजूंना त्याचा नक्कीच फायदा होईल. अवयवदात्यांच्या कुटुंबाचे कौतुक केले पाहिजे. हृदय प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तीची प्रकृती आता स्थिर आहे. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. पुढचे ४८ ते ७२ तास त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती हृदय शल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी दिली. (प्रतिनिधी) >हृदयाचा प्रवास!मंगळवार, २६ एप्रिलला सकाळी १०.३३ वाजता सुरतच्या रुग्णालयातून डॉक्टर हृदय घेऊन निघाले. १०.३८ ला हृदय घेऊन डॉक्टर सुरतच्या विमानतळावर पोहोचले. १०.४१ वाजता सुरत विमानतळावरून चार्टर्ड फ्लाइट निघाले आणि ११.२० वाजता मुंबई विमानतळावर पोहोचले. ११.३१ वाजता रुग्णवाहिका विमानतळावरून निघाली आणि ११.४७ वा. रुग्णालयात पोहोचली.