शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

देशात मध्यावधी निवडणुका होणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 21:24 IST

काँग्रेसने आज नागपुरात 'वोट चोर, गद्दी छोड' असा भव्य मेळावा घेतला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे.

देशातील लोकशाही आणि संविधानाला भाजपमुळे धोका निर्माण झाला असून, भाजपने मतांची चोरी करून सत्ता मिळवली आहे, असा आरोप करत काँग्रेसने आज नागपुरात 'वोट चोर, गद्दी छोड' असा भव्य मेळावा घेतला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाखालची वाळू सरकली असून, देशात कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणुका लागतील, असे सपकाळ म्हणाले.

'लोकशाहीला हात लावणाऱ्या भाजप सरकारला हा एक इशारा आहे. ज्या नागपूरमधून ७५ वर्षांच्या नेत्यांना खुर्ची खाली करण्याचे आदेश निघाले आहेत, त्यामुळे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा देशात मध्यावधी निवडणुका होतील आणि शिव, शाहू, फुले व आंबेडकरांच्या विचारांचे नवे सरकार येईल,' असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. 

भाजपने १३२ आमदार चोरून निवडून आणले!याच मेळाव्यात बोलताना विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, 'भाजपने मतांची चोरी करून महाराष्ट्रात १३२ आमदार निवडून आणले आहेत. हे लोक घाबरट आहेत. मतांची चोरी करून सत्तेत आले आहेत. आता मतदारच या मतचोरांना शिक्षा देतील.'

निवडणूक आयोग भाजपच्या इशार्‍यावर चालतो?माजी मंत्री नसीम खान यांनी थेट निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'लोकसभेत 'महाविकास आघाडी'ला मोठे यश मिळाले, पण पाच महिन्यांतच चित्र बदलले. निवडणूक आयोगाने ४५ लाख मतदार वाढवले. निवडणूक आयोग भाजपच्या इशार्यावर काम करत आहे, आणि राहुल गांधी यांनी आवाज उठवूनही आयोग समाधानकारक उत्तर देत नाही.'

या भव्य मेळाव्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह इतर नेत्यांनीही मतचोरीच्या मुद्द्यावर भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका केली. लोकशाही आणि संविधानावर होणारा हा हल्ला हाणून पाडला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.