शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशात मध्यावधी निवडणुका होणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 21:24 IST

काँग्रेसने आज नागपुरात 'वोट चोर, गद्दी छोड' असा भव्य मेळावा घेतला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे.

देशातील लोकशाही आणि संविधानाला भाजपमुळे धोका निर्माण झाला असून, भाजपने मतांची चोरी करून सत्ता मिळवली आहे, असा आरोप करत काँग्रेसने आज नागपुरात 'वोट चोर, गद्दी छोड' असा भव्य मेळावा घेतला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाखालची वाळू सरकली असून, देशात कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणुका लागतील, असे सपकाळ म्हणाले.

'लोकशाहीला हात लावणाऱ्या भाजप सरकारला हा एक इशारा आहे. ज्या नागपूरमधून ७५ वर्षांच्या नेत्यांना खुर्ची खाली करण्याचे आदेश निघाले आहेत, त्यामुळे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा देशात मध्यावधी निवडणुका होतील आणि शिव, शाहू, फुले व आंबेडकरांच्या विचारांचे नवे सरकार येईल,' असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. 

भाजपने १३२ आमदार चोरून निवडून आणले!याच मेळाव्यात बोलताना विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, 'भाजपने मतांची चोरी करून महाराष्ट्रात १३२ आमदार निवडून आणले आहेत. हे लोक घाबरट आहेत. मतांची चोरी करून सत्तेत आले आहेत. आता मतदारच या मतचोरांना शिक्षा देतील.'

निवडणूक आयोग भाजपच्या इशार्‍यावर चालतो?माजी मंत्री नसीम खान यांनी थेट निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'लोकसभेत 'महाविकास आघाडी'ला मोठे यश मिळाले, पण पाच महिन्यांतच चित्र बदलले. निवडणूक आयोगाने ४५ लाख मतदार वाढवले. निवडणूक आयोग भाजपच्या इशार्यावर काम करत आहे, आणि राहुल गांधी यांनी आवाज उठवूनही आयोग समाधानकारक उत्तर देत नाही.'

या भव्य मेळाव्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह इतर नेत्यांनीही मतचोरीच्या मुद्द्यावर भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका केली. लोकशाही आणि संविधानावर होणारा हा हल्ला हाणून पाडला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.