शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

‘मेट्रो’ला हवी ‘आरे’त आणखी जागा, १२ हजार चौ.मी. जागेची ‘आरे’कडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 05:19 IST

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामासाठी आरे कॉलनीमध्ये आणखी १२ हजार चौरस मीटर जागा लागणार आहे; तशी मागणीच कॉर्पोरेशनने आरेकडे केली आहे.

मुंबई - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामासाठी आरे कॉलनीमध्ये आणखी १२ हजार चौरस मीटर जागा लागणार आहे; तशी मागणीच कॉर्पोरेशनने आरेकडे केली आहे. आरे कॉलनी येथील मरोळ भागातील सुमारे १२ हजार चौरस मीटर जागेपैकी अंडरपासच्या कामासाठी कायमस्वरूपी ५ हजार ३५२ चौरस मीटर व तात्पुरत्या बांधकामासाठी ६ हजार ४७८ चौरस मीटर असे या जागेचे स्वरूप आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आरे कॉलनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत अधिकच्या जागेसाठीचा प्रस्ताव मांडला आहे. मेट्रो-३ हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने कायमस्वरूपी अंडरपास उभारण्यासाठी व दोन वर्षे तात्पुरत्या बांधकामासाठी जागेबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आरे कॉलनीमधील ३० हेक्टर जमीन ताब्यात घेण्याबाबत आक्षेप घेतला जात असतानाच पुन्हा १२ हजार चौरस मीटर जागेची मागणी करण्यात आली आहे. कॉर्पोरेशनने दाखल केलेला प्रस्ताव आता आरे प्रशासनाकडून मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे याबाबत विचारणा केली असता; जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले की, आरेचा कार डेपो भूमिगत नाही, तर जमिनीवर नियोजित आहे. डेपोलगत मरोळ-मरोशी रस्ता असून तो प्रस्तावित रॅम्पला विभागून जातो. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांची वाहतूक अबाधित ठेवण्यासाठी तेथे रेल्वेमार्गाखालून पूल (अंडरपास) बांधण्याचे नियोजित आहे.परिणामी अंडरपासच्या बांधकामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला ५ हजार ३५२ चौरस मीटर इतक्या जागेची कायमस्वरूपी गरज आहे. बांधकामादरम्यान ६ हजार ४७८ चौरस मीटर जागेची तात्पुरत्या स्वरूपात आवश्यकता आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर कॉर्पोरेशन तात्पुरत्या स्वरूपात लागणारी जमीन संबंधित विभागास हस्तांतरित करणार आहे.जागा बळकावण्याचे कामआरे कॉलनीमधील जागा बळकावण्याचे काम सुरू आहे. विकासकांना फायदा पोहोचवण्यासाठी अजून जागेची मागणी केली जात आहे. संपूर्ण आरे कॉलनी ‘ना विकास क्षेत्र’ असताना सरकारकडून आणि एमएमआरसीकडून आरेमध्ये घुसखोरी केली जात आहे. मेट्रो-३ प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आराखडे, नकाशे तयार केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आता अधिक जागेची मागणी करण्यात येत आहे. मेट्रो-३ भूमिगत केल्यामुळे ४० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येत आहे. जर हाच प्रकल्प उन्नत केला असता तर साधारण ५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असता. विकास आराखड्यातील मेट्रो शेडसाठी राखीव जागा बळकावण्यात येत आहे. विनाकारण ४ हजार वृक्षांचा बळी देत वन उद्ध्वस्त केले जात आहे. तज्ज्ञांचे मत फेटाळून ‘विकासकांसाठी’ मार्ग तयार केला जात आहे.- डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती‘आरे’ वाचवण्यासाठी प्रयत्न नाहीचआरे कॉलनी वाचवण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. आरे कॉलनीमध्ये मेट्रोचे कारशेड बनत असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ‘ना विकास क्षेत्र’ आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची विकासात्मक कामे होता कामा नयेत. मात्र, येथे मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. मेट्रोमुळे काही वर्षांत आरे कॉलनीच्या परिसरात रहदारी वाढेल. वसाहती वाढतील. वनाची तोड होईल. पर्यावरणाचा समतोल बिघडेल. मुंबईच्या हिरवळीवर घाव घालण्यात येत असून, याबाबत वेळीच पावले उचलण्याची गरज आहे.- गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन

टॅग्स :Metroमेट्रोMumbaiमुंबई