शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हवामान खात्याने वर्तविला अंदाज पावसाचा, पडले ऊन, हवामान खात्याचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:36 IST

सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र हवामान खात्याचा अंदाज सपशेल खोटा ठरला आणि पावसाऐवजी दिवसभर पडलेल्या उन्हामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा ‘ताप’दायक वातावरणाला सामोरे जावे लागले.

मुंबई : सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र हवामान खात्याचा अंदाज सपशेल खोटा ठरला आणि पावसाऐवजी दिवसभर पडलेल्या उन्हामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा ‘ताप’दायक वातावरणाला सामोरे जावे लागले. कुलाबा आणि सांताक्रुझ येथे पावसाची अनुक्रमे १.०, १.४ मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९.३, २५.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र मुंबईकरांचा सोमवार कोरडा गेला असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता मंगळवारसह बुधवारी पाऊस कोसळेल का? याकडे हवामान खात्यासह मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. १९ आणि २० सप्टेंबर रोजी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.>सोमवारी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यामुळे मुंबईकरांनी जवळ छत्री बाळगली. प्रत्यक्षात पाऊस पडलाच नाही. उलट उन्हाचा कडाका वाढला. त्यामुळे अखेर पावसासाठी जवळ बाळगलेली छत्री मुंबईकरांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी उघडावी लागली.