शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सत्ताधाऱ्यांची धर्मकारणाला मूकसंमती असल्याचा संदेश

By admin | Updated: November 21, 2015 02:51 IST

साहित्यिक-कलावंतांना आत्ताच असहिष्णुता कशी आठवली? याबद्दल ‘पुरस्कार वापसी’च्या कृतीवर टीका करणारे सत्ताधारी विचारणा करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, अत्याचाराच्या

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर , साहित्य नगरी

साहित्यिक-कलावंतांना आत्ताच असहिष्णुता कशी आठवली? याबद्दल ‘पुरस्कार वापसी’च्या कृतीवर टीका करणारे सत्ताधारी विचारणा करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, अत्याचाराच्या घटनांना धर्मकारणाचा आधार देऊन त्यांचे समर्थन करण्यात येत आहे. त्या समर्थनाला आवर घालण्याचा किंचितही प्रयत्न सत्ताधारी करताना दिसत नाहीत, ही खेदाची बाब आहे. यामुळे साहित्यिक, कलावंत आणि विचारवंतांन कधीही न जाणवलेली भीती वाटत आहे. सत्ताधाऱ्यांच्या निमूट राहण्यातून त्यांची या धर्मकारणाला मूकसंमती आहे, असाच संदेश सगळीकडे जातअसल्याची परखड टीका १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत पवार यांनी केली. रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीत दिमाखात करण्यात आले. या प्रसंगी, मावळते संमेलनाध्यक्ष कवी अशोक नायगावकर यांनी संमेलनाच्या प्रतीकात्मक पालखीची धुरा संमेलनाध्यक्ष जयंत पवार यांच्या खांद्यावर सोपविली. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार, कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, प्रा.एल.बी. पाटील, मुख्य समन्वयक शशीकांत तिरोडकर, संमेलन समिती प्रमुख रवींद्र आवटी, व्यावसायिक सुरेश हावरे, माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे, सारस्वत बँकेचे संचालक किशोर रांगणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आजची परिस्थिती लिहिणाऱ्यांसाठी, व्यक्त होऊ पाहणाऱ्यांसाठी अतिशय चिंताजनक बनली आहे. देशातील या परिस्थितीचा निषेध म्हणून काही साहित्यिकांनी आपले पुरस्कार शासनाला परत केले. त्यांची ही कृती महत्त्वाची आहे. पण तिच्यामागचा हेतू सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो हेतूच दूषित करुन सर्वांच्या मनात गोंधळ उडवून दिला जात असल्याचे संमेलनाध्यक्ष पवार यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी साहित्यिक-कलावंतांना भयमुक्त वातावरण द्यावे, एवढीच साहित्य विश्वाची अपेक्षा आहे. हे वातावरण निर्माण होण्यात आडकाठी आणणाऱ्या घटकांवर अंकुश ठेवावा, अशी माफक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तर लेखकांनी आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत वास्तवाचे भान वाचकाला आणून द्यावे आणि त्याचा विवेक जागवावा, अशी सूचनाही पवार यांनी साहित्यिकांना केली. (प्रतिनिधी)विचारांची चर्चा होणे हे जागरूकपणाचे लक्षण - मुख्यमंत्रीदेशाची प्रगतीकडे वाटचाल होत असताना, वेगवेगळ्या विचारांची चर्चा होणे हे जागरूकपणाचे लक्षण आहे. टीका करणे हे तर आपल्या रक्तातच असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केले. देशाच्या संस्कृतीत, सहिष्णुतेत सगळ््या विचारांना सामावून घेण्याची ताकद आहे. असे सांगताना त्यांनी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाचा आवर्जून उल्लेख केला. विविध विचारांसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे हे व्यासपीठ एक उत्तम असल्याचेही ते म्हणाले. कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित प्रबोधनकार ठाकरे व्यासपीठावर कोमसाप साहित्यमित्र पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. आज निवडक विचार करण्याची वेळ नाही. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे, किंबहुना हा अधिकार त्यांच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. त्या विचारांवर विचारमंथन होणे हीच काळाची गरज आहे. त्यातून मग कोणाच्याही चांगल्या गोष्टी स्वीकारुन वाईट गोष्टींवर टीका केली पाहिजे. आज जगभरातील सर्वात तरुण देश म्हणून आपली ओळख आहे. देशाची ५० टक्के लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे. ही लोकसंख्या मानव संसाधनामध्ये रुपांतरीत होणार आहे. हीच आपली विकासाची वाटचाल ठरू शकेल. या वाटचालीसाठी साहित्यिक आणि विचारवंतांवरही मोठी जबाबदारी आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री