शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांची धर्मकारणाला मूकसंमती असल्याचा संदेश

By admin | Updated: November 21, 2015 02:51 IST

साहित्यिक-कलावंतांना आत्ताच असहिष्णुता कशी आठवली? याबद्दल ‘पुरस्कार वापसी’च्या कृतीवर टीका करणारे सत्ताधारी विचारणा करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, अत्याचाराच्या

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर , साहित्य नगरी

साहित्यिक-कलावंतांना आत्ताच असहिष्णुता कशी आठवली? याबद्दल ‘पुरस्कार वापसी’च्या कृतीवर टीका करणारे सत्ताधारी विचारणा करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, अत्याचाराच्या घटनांना धर्मकारणाचा आधार देऊन त्यांचे समर्थन करण्यात येत आहे. त्या समर्थनाला आवर घालण्याचा किंचितही प्रयत्न सत्ताधारी करताना दिसत नाहीत, ही खेदाची बाब आहे. यामुळे साहित्यिक, कलावंत आणि विचारवंतांन कधीही न जाणवलेली भीती वाटत आहे. सत्ताधाऱ्यांच्या निमूट राहण्यातून त्यांची या धर्मकारणाला मूकसंमती आहे, असाच संदेश सगळीकडे जातअसल्याची परखड टीका १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत पवार यांनी केली. रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीत दिमाखात करण्यात आले. या प्रसंगी, मावळते संमेलनाध्यक्ष कवी अशोक नायगावकर यांनी संमेलनाच्या प्रतीकात्मक पालखीची धुरा संमेलनाध्यक्ष जयंत पवार यांच्या खांद्यावर सोपविली. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार, कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, प्रा.एल.बी. पाटील, मुख्य समन्वयक शशीकांत तिरोडकर, संमेलन समिती प्रमुख रवींद्र आवटी, व्यावसायिक सुरेश हावरे, माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे, सारस्वत बँकेचे संचालक किशोर रांगणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आजची परिस्थिती लिहिणाऱ्यांसाठी, व्यक्त होऊ पाहणाऱ्यांसाठी अतिशय चिंताजनक बनली आहे. देशातील या परिस्थितीचा निषेध म्हणून काही साहित्यिकांनी आपले पुरस्कार शासनाला परत केले. त्यांची ही कृती महत्त्वाची आहे. पण तिच्यामागचा हेतू सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो हेतूच दूषित करुन सर्वांच्या मनात गोंधळ उडवून दिला जात असल्याचे संमेलनाध्यक्ष पवार यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी साहित्यिक-कलावंतांना भयमुक्त वातावरण द्यावे, एवढीच साहित्य विश्वाची अपेक्षा आहे. हे वातावरण निर्माण होण्यात आडकाठी आणणाऱ्या घटकांवर अंकुश ठेवावा, अशी माफक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तर लेखकांनी आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत वास्तवाचे भान वाचकाला आणून द्यावे आणि त्याचा विवेक जागवावा, अशी सूचनाही पवार यांनी साहित्यिकांना केली. (प्रतिनिधी)विचारांची चर्चा होणे हे जागरूकपणाचे लक्षण - मुख्यमंत्रीदेशाची प्रगतीकडे वाटचाल होत असताना, वेगवेगळ्या विचारांची चर्चा होणे हे जागरूकपणाचे लक्षण आहे. टीका करणे हे तर आपल्या रक्तातच असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केले. देशाच्या संस्कृतीत, सहिष्णुतेत सगळ््या विचारांना सामावून घेण्याची ताकद आहे. असे सांगताना त्यांनी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाचा आवर्जून उल्लेख केला. विविध विचारांसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे हे व्यासपीठ एक उत्तम असल्याचेही ते म्हणाले. कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित प्रबोधनकार ठाकरे व्यासपीठावर कोमसाप साहित्यमित्र पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. आज निवडक विचार करण्याची वेळ नाही. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे, किंबहुना हा अधिकार त्यांच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. त्या विचारांवर विचारमंथन होणे हीच काळाची गरज आहे. त्यातून मग कोणाच्याही चांगल्या गोष्टी स्वीकारुन वाईट गोष्टींवर टीका केली पाहिजे. आज जगभरातील सर्वात तरुण देश म्हणून आपली ओळख आहे. देशाची ५० टक्के लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे. ही लोकसंख्या मानव संसाधनामध्ये रुपांतरीत होणार आहे. हीच आपली विकासाची वाटचाल ठरू शकेल. या वाटचालीसाठी साहित्यिक आणि विचारवंतांवरही मोठी जबाबदारी आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री