शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

आनंददायी अभ्यंगस्नान

By admin | Updated: November 7, 2015 01:24 IST

पहाटे सूर्य उगवायच्या आत उटणे, सुगंधी तेल लावून गरम गरम पाण्याने अभ्यंगस्नान केले की खऱ्या अर्थाने दिवसाची सुरू झाल्याचा आनंद मिळतो. धनत्रयोदशीपासूनच दिवाळी

पहाटे सूर्य उगवायच्या आत उटणे, सुगंधी तेल लावून गरम गरम पाण्याने अभ्यंगस्नान केले की खऱ्या अर्थाने दिवसाची सुरू झाल्याचा आनंद मिळतो. धनत्रयोदशीपासूनच दिवाळी सुरू होत असली तरी अभ्यंगस्नान, फटाके फोडण्यास सुरुवात होते ती नरक चतुर्दशीपासून. श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिने या दिवशी नरकासुराचा वध केला, अशी एक पुराणकथा आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी जो अंघोळ करणार नाही तो नरकात जाईल, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची, पायाच्या अंगठ्याने कारेटे फोडून दिवे लावून विजयोत्सव साजरा केला जातो. या अनोख्या प्रथेविषयी...पूर्वी घराघरातील महिला या पहिल्या अंघोळीची सर्व तयारी करीत. शिकेकाई, रिठा, कडुनिंब यासारख्या औषधी वनस्पती तांब्याच्या भांड्यातील पाण्यात घालून ते पाणी उकळून घेत. हे पाणी केस धुण्यासाठी वापरले जात असे. अंघोळीपूर्वी महिला घरातील पुरुषांना आणि मुलांना तेलाने मालीश करीत. हे तेल प्रामुख्याने जाईच्या सुवासिक फुलांचे असे. हे फुल सात्विक मानले जाते. राधाकृष्णासाठी जाईजुईच्या फुलांची, तुळशीची आरास करायची असा उल्लेख लोककथा आणि गीतांमध्ये आहे. सुवासिक तेलाचे मालीश झाले की बेसन, हळद, चंदन, गुलाबपाणी यापासून तयार केलेले सुगंधी उटणे अंगाला लावले जाते. आजच्या काळात ज्याला स्क्रब म्हटले जाते असे हे नैसर्गिक स्क्रब असलेले उटणे लावल्याने जुनी त्वचा निघून जाते आणि त्वचा टवटवीत व कोमल होते. काही घरांत उटण्यामध्ये कापूर, साय, संत्र्याची सालही वापरली जाते.उटण्याचे अंग घासून झाले की जाईच्या साबणाने अंघोळ केली जाते. अंघोळीच्या शेवटी प्रार्थना करण्याची व अर्ध्य देण्याची पद्धत आहे. अंघोळीनंतर पारंपरिक पोशाख केला जातो. रांगोळी काढली जाते. दारे-खिडक्यांमध्ये पणत्या लावतात. सर्वजण मिळून फराळाचा आस्वाद घेतात.मात्र बदलती जीवनशैली, विभक्त कुटुंबपद्धती यामुळे सण साजरा करण्याची पद्धतही बदलली आहे. पहाटे उठून तेलमालीश, उटणे लावून अंघोळ करणे हे अनेकांना वेळखाऊ वाटते. त्यामुळे पहिली अंघोळ अगदी झटपट उरकली जाते. मात्र अभ्यंगस्नान बदलत्या जीवनशैलीतील अधिक उपयुक्त आहे. अभ्यंगस्नानामुळे आपण परंपरा जपतोच, शिवाय त्यामुळे नवी उमेद मिळते. जाईच्या सुवासिक तेलाने मालीश केल्याने शरीर टवटवीत होते, ताणतणाव नाहीसे होतात. अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीत न करता दर आठवड्याला करावे, असा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्रथा जुन्या व नव्या पिढीतील अंतर दूर करते आणि नाते अधिक दृढ करते.