शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आनंददायी अभ्यंगस्नान

By admin | Updated: November 7, 2015 01:24 IST

पहाटे सूर्य उगवायच्या आत उटणे, सुगंधी तेल लावून गरम गरम पाण्याने अभ्यंगस्नान केले की खऱ्या अर्थाने दिवसाची सुरू झाल्याचा आनंद मिळतो. धनत्रयोदशीपासूनच दिवाळी

पहाटे सूर्य उगवायच्या आत उटणे, सुगंधी तेल लावून गरम गरम पाण्याने अभ्यंगस्नान केले की खऱ्या अर्थाने दिवसाची सुरू झाल्याचा आनंद मिळतो. धनत्रयोदशीपासूनच दिवाळी सुरू होत असली तरी अभ्यंगस्नान, फटाके फोडण्यास सुरुवात होते ती नरक चतुर्दशीपासून. श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिने या दिवशी नरकासुराचा वध केला, अशी एक पुराणकथा आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी जो अंघोळ करणार नाही तो नरकात जाईल, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची, पायाच्या अंगठ्याने कारेटे फोडून दिवे लावून विजयोत्सव साजरा केला जातो. या अनोख्या प्रथेविषयी...पूर्वी घराघरातील महिला या पहिल्या अंघोळीची सर्व तयारी करीत. शिकेकाई, रिठा, कडुनिंब यासारख्या औषधी वनस्पती तांब्याच्या भांड्यातील पाण्यात घालून ते पाणी उकळून घेत. हे पाणी केस धुण्यासाठी वापरले जात असे. अंघोळीपूर्वी महिला घरातील पुरुषांना आणि मुलांना तेलाने मालीश करीत. हे तेल प्रामुख्याने जाईच्या सुवासिक फुलांचे असे. हे फुल सात्विक मानले जाते. राधाकृष्णासाठी जाईजुईच्या फुलांची, तुळशीची आरास करायची असा उल्लेख लोककथा आणि गीतांमध्ये आहे. सुवासिक तेलाचे मालीश झाले की बेसन, हळद, चंदन, गुलाबपाणी यापासून तयार केलेले सुगंधी उटणे अंगाला लावले जाते. आजच्या काळात ज्याला स्क्रब म्हटले जाते असे हे नैसर्गिक स्क्रब असलेले उटणे लावल्याने जुनी त्वचा निघून जाते आणि त्वचा टवटवीत व कोमल होते. काही घरांत उटण्यामध्ये कापूर, साय, संत्र्याची सालही वापरली जाते.उटण्याचे अंग घासून झाले की जाईच्या साबणाने अंघोळ केली जाते. अंघोळीच्या शेवटी प्रार्थना करण्याची व अर्ध्य देण्याची पद्धत आहे. अंघोळीनंतर पारंपरिक पोशाख केला जातो. रांगोळी काढली जाते. दारे-खिडक्यांमध्ये पणत्या लावतात. सर्वजण मिळून फराळाचा आस्वाद घेतात.मात्र बदलती जीवनशैली, विभक्त कुटुंबपद्धती यामुळे सण साजरा करण्याची पद्धतही बदलली आहे. पहाटे उठून तेलमालीश, उटणे लावून अंघोळ करणे हे अनेकांना वेळखाऊ वाटते. त्यामुळे पहिली अंघोळ अगदी झटपट उरकली जाते. मात्र अभ्यंगस्नान बदलत्या जीवनशैलीतील अधिक उपयुक्त आहे. अभ्यंगस्नानामुळे आपण परंपरा जपतोच, शिवाय त्यामुळे नवी उमेद मिळते. जाईच्या सुवासिक तेलाने मालीश केल्याने शरीर टवटवीत होते, ताणतणाव नाहीसे होतात. अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीत न करता दर आठवड्याला करावे, असा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्रथा जुन्या व नव्या पिढीतील अंतर दूर करते आणि नाते अधिक दृढ करते.