शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पारा@४५; उष्णतेची लाट, धुळीचे वादळ, अवेळी पावसासह उकाडा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:42 IST

उत्तर भारतात येणार धुळीचे वादळ : आर्द्रतेमधील चढउतार मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक

मुंबई : मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू असतानाच देशासह राज्याच्या हवामानात मान्सूनपूर्व बदल नोंदविण्यात येत आहेत. या बदलाच्या नोंदीनुसार महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर उत्तर भारतात काही ठिकाणी धुळीचे वादळ उठणार असून, काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शिवाय दक्षिण भारतातही काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला आहे.राज्याचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसहून अधिक नोंदविण्यात येत असून, मुंबईचे कमाल तापमान ३३ ते ३४ अंशावर स्थिर आहे. मात्र आर्द्रतेमधील चढउतार मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक ठरत आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार...च्जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर वाढेल. पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये धुळीच्या वादळासह पावसाची शक्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये हवामान उष्ण आणि कोरडे राहील. विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येईल.

च्आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व बिहार, झारखंड आणि ओरिसामध्ये पावसाची शक्यता आहे. तेलंगणामध्ये उष्णतेची लाट येईल. केरळ आणि कर्नाटकमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तेलंगणा, रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे. अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर पाऊस राहील.विदर्भात उष्णतेची लाट२३ मे : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.२४ आणि २५ मे : विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.२६ मे : विदर्भात काही ठिकाणी उष्णतेचीलाट येईल.कोकणात पावसाची शक्यता२३ मे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.२४ मे : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.च्मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.च्राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यातआले आहे.मुंबई राहणार ढगाळच्गुरुवारसह शुक्रवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील.च्मुंबईची आर्द्रता ८० टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात येत असून कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात