शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

७० बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांचे परवाने धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 06:28 IST

शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने हरभ-याची खरेदी करणा-या शहादा बाजार समितीतील आठ व्यापाºयांचे परवाने मंगळवारी रद्द करण्यात आले. राज्यातील ७० बाजार समित्यांमधील व्यापा-यांनी हमीभावाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचेही परवाने धोक्यात आले आहेत.

- रमाकांत पाटील नंदुरबार : शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने हरभ-याची खरेदी करणा-या शहादा बाजार समितीतील आठ व्यापा-यांचे परवाने मंगळवारी रद्द करण्यात आले. राज्यातील ७० बाजार समित्यांमधील व्यापा-यांनी हमीभावाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचेही परवाने धोक्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला.बाजार समित्यांचे दोन दिवसांतील खरेदी दर आॅनलाइनवर तपासल्यानंतर, बहुतांश ठिकाणी हरभºयाची कमी दराने खरेदी झाल्याचे आढळले. ९ एप्रिलला १२१ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये हरभरा खरेदी झाली. त्यात लातूरमध्ये क्विंटलला सर्वाधिक सहा हजार ९९९ दर मिळाला. अमरावतीत चार हजार ८७ रुपये, नागपूरमध्ये तीन हजार २०० ते तीन हजार ५७० असा भाव मिळाला. लासलगावमध्ये तर हमीभावाच्या निम्म्यापेक्षाही कमी भावाने म्हणजे दोन हजार रुपये क्विंटलने हरभरा खरेदी झाला आहे. शिरपूर, पुणे, दोंडाईचा, माजलगाव, जालना आदी काही बाजार समित्यांमध्ये चार हजार ४०० पासून सात हजारापर्यंतही भाव देण्यात आला. मात्र, काहींनी हमीभावापेक्षा कमी दर दिला. नंदुरबारप्रमाणेच हमीभावापेक्षा कमी दर दिलेल्या बाजार समित्यांच्या व्यापाºयांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.नियमभंग करणाºया इतर व्यापाºयांवरही तातडीने कारवाई झाली पाहिजे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शहादाप्रमाणेच राज्यभर आंदोलन करेल. शेतकºयांची फसवणूक करणाºयांवर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तूपकर यांनी दिला.हमीभावाचा कायदा काय?हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमानुसार कारवाईकरण्याचा अधिकार बाजार समितींना आहे. महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमन १९६३ चा नियम आणि १९६७ मधील ९४ ड (३) यानुसार व्यापाºयांचे परवानेरद्द करण्याचे अधिकार समितींना आहेत. त्याच कायद्यानुसार शहाद्यातील आठ व्यापाºयांचे परवाने रद्द केले आहेत.‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाचे फलितशहादा बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याचे सांगत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चार दिवसांपूर्वी आंदोलन सुरू केले होते.त्याला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी शेतकºयांवर लाठीमार केला. त्या विरोधात शेतकºयांनी मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून काहीलेखी आश्वासने दिली. त्यात शहादा बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा खरेदी करणाºया आठ व्यापाºयांचे परवाने निलंबित केले आहेत.