शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

७० बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांचे परवाने धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 06:28 IST

शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने हरभ-याची खरेदी करणा-या शहादा बाजार समितीतील आठ व्यापाºयांचे परवाने मंगळवारी रद्द करण्यात आले. राज्यातील ७० बाजार समित्यांमधील व्यापा-यांनी हमीभावाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचेही परवाने धोक्यात आले आहेत.

- रमाकांत पाटील नंदुरबार : शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने हरभ-याची खरेदी करणा-या शहादा बाजार समितीतील आठ व्यापा-यांचे परवाने मंगळवारी रद्द करण्यात आले. राज्यातील ७० बाजार समित्यांमधील व्यापा-यांनी हमीभावाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचेही परवाने धोक्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला.बाजार समित्यांचे दोन दिवसांतील खरेदी दर आॅनलाइनवर तपासल्यानंतर, बहुतांश ठिकाणी हरभºयाची कमी दराने खरेदी झाल्याचे आढळले. ९ एप्रिलला १२१ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये हरभरा खरेदी झाली. त्यात लातूरमध्ये क्विंटलला सर्वाधिक सहा हजार ९९९ दर मिळाला. अमरावतीत चार हजार ८७ रुपये, नागपूरमध्ये तीन हजार २०० ते तीन हजार ५७० असा भाव मिळाला. लासलगावमध्ये तर हमीभावाच्या निम्म्यापेक्षाही कमी भावाने म्हणजे दोन हजार रुपये क्विंटलने हरभरा खरेदी झाला आहे. शिरपूर, पुणे, दोंडाईचा, माजलगाव, जालना आदी काही बाजार समित्यांमध्ये चार हजार ४०० पासून सात हजारापर्यंतही भाव देण्यात आला. मात्र, काहींनी हमीभावापेक्षा कमी दर दिला. नंदुरबारप्रमाणेच हमीभावापेक्षा कमी दर दिलेल्या बाजार समित्यांच्या व्यापाºयांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.नियमभंग करणाºया इतर व्यापाºयांवरही तातडीने कारवाई झाली पाहिजे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शहादाप्रमाणेच राज्यभर आंदोलन करेल. शेतकºयांची फसवणूक करणाºयांवर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तूपकर यांनी दिला.हमीभावाचा कायदा काय?हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमानुसार कारवाईकरण्याचा अधिकार बाजार समितींना आहे. महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमन १९६३ चा नियम आणि १९६७ मधील ९४ ड (३) यानुसार व्यापाºयांचे परवानेरद्द करण्याचे अधिकार समितींना आहेत. त्याच कायद्यानुसार शहाद्यातील आठ व्यापाºयांचे परवाने रद्द केले आहेत.‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाचे फलितशहादा बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याचे सांगत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चार दिवसांपूर्वी आंदोलन सुरू केले होते.त्याला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी शेतकºयांवर लाठीमार केला. त्या विरोधात शेतकºयांनी मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून काहीलेखी आश्वासने दिली. त्यात शहादा बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा खरेदी करणाºया आठ व्यापाºयांचे परवाने निलंबित केले आहेत.