शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

पिकवायला सांगता; मग आयात का करता? राजू शेट्टींचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करतात. देशात डाळीचे उत्पादनही चांगले होते; पण

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 23 - पंतप्रधान नरेंद्र मोदी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करतात. देशात डाळीचे उत्पादनही चांगले होते; पण पिकवायला सांगून आयात का केली जाते? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज ह्यलोकमतह्णशी बोलताना केला. केंद्र सरकारच्या कृषी आणि आयात -निर्यात धोरणावरही त्यांनी टीका केली.खासदार शेट्टी हे उस्मानाबाद आणि सोलापूर दौऱ्यावर होते. माढा येथे सर्वाधिक ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला. सायंकाळी  लोकमतशी दूरध्वनीवरून बोलताना केंद्राच्या कृषी धोरणाचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, केंद्रीय कृषी आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय एकाच इमारतीत आहेत; पण या दोन्ही मंत्रालयामध्ये समन्वय नाही. देशात डाळीचे उत्पादन वाढले असताना ५ लाख टन डाळ आयात केली आहे. खाद्य तेल, कांद्याची आयात केली जात आहे. गेल्या चार वर्षात २८ हजार कोटी रूपयांची आयात वाढून १ लाख ४० हजार कोटी रूपयांपर्यंत पोहोचली असून, केंद्राचे हे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही.देशातील शेतकरी अस्वस्थ आहे. केंद्राच्या धोरणामुळेच त्याची अस्वस्थता वाढत आहे. शेतीमाल पिकत असताना तो आयात केला जातो आणि शेतकरी आर्थिकदृष्टया अडचणीत येतो. या स्थितीमुळेच शेतकरी सुखी नाही. शेतकऱ्यांची नजर शिवारात, बाजारात आणि राजकारणावर असायला हवी; पण शिवारात पिकणारच नसेल तर अन्य ठिकाणी शेतकरी लक्ष तरी कसा देणार? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.