शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पिकवायला सांगता; मग आयात का करता? राजू शेट्टींचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करतात. देशात डाळीचे उत्पादनही चांगले होते; पण

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 23 - पंतप्रधान नरेंद्र मोदी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करतात. देशात डाळीचे उत्पादनही चांगले होते; पण पिकवायला सांगून आयात का केली जाते? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज ह्यलोकमतह्णशी बोलताना केला. केंद्र सरकारच्या कृषी आणि आयात -निर्यात धोरणावरही त्यांनी टीका केली.खासदार शेट्टी हे उस्मानाबाद आणि सोलापूर दौऱ्यावर होते. माढा येथे सर्वाधिक ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला. सायंकाळी  लोकमतशी दूरध्वनीवरून बोलताना केंद्राच्या कृषी धोरणाचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, केंद्रीय कृषी आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय एकाच इमारतीत आहेत; पण या दोन्ही मंत्रालयामध्ये समन्वय नाही. देशात डाळीचे उत्पादन वाढले असताना ५ लाख टन डाळ आयात केली आहे. खाद्य तेल, कांद्याची आयात केली जात आहे. गेल्या चार वर्षात २८ हजार कोटी रूपयांची आयात वाढून १ लाख ४० हजार कोटी रूपयांपर्यंत पोहोचली असून, केंद्राचे हे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही.देशातील शेतकरी अस्वस्थ आहे. केंद्राच्या धोरणामुळेच त्याची अस्वस्थता वाढत आहे. शेतीमाल पिकत असताना तो आयात केला जातो आणि शेतकरी आर्थिकदृष्टया अडचणीत येतो. या स्थितीमुळेच शेतकरी सुखी नाही. शेतकऱ्यांची नजर शिवारात, बाजारात आणि राजकारणावर असायला हवी; पण शिवारात पिकणारच नसेल तर अन्य ठिकाणी शेतकरी लक्ष तरी कसा देणार? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.