शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: May 5, 2015 01:31 IST

श्रीवर्धन तालुक्यातील सतीचीवाडी येथील रसिका मांडवकर या निराधार महिलेला गावपंचांनी गेल्या आठ वर्षांपासून वाळीत टाकले आहे.

अलिबाग : श्रीवर्धन तालुक्यातील सतीचीवाडी येथील रसिका मांडवकर या निराधार महिलेला गावपंचांनी गेल्या आठ वर्षांपासून वाळीत टाकले आहे. याबाबतची तक्रार तिने काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाच्या मध्यस्थीनंतरही तिच्यावरील सामाजिक बहिष्काराची तलवार अद्यापही टांगती आहे. तिने प्रशासनासह मुख्यमंत्र्यांचे दरवाजे ठोठावत अर्ज केला आहे.गावातील महादेव भोंबरे यांच्या आईबरोबर रसिकाचे पती रमेश यांचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्यावरून मुंबईच्या कार्यकारिणीने गावातील स्थानिक कार्यकारिणीच्या वतीने बैठक बोलावून रमेशला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. तो अमान्य केल्याने मांडवकर कुटुंबाला गावबंदी केली. सततच्या जाचामुळे रमेश गावातून बेपत्ता झाले. त्यानंतर गावकीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करून अन्न पाण्यावाचून दोन दिवस डांबून ठेवले.तसेच कष्टाच्या कमाईतून घर बांधण्यास २६ जानेवारीच्या ग्रामसभेत गावपंचांनी विरोध केला आणि परवानगी पाहिजे असेल, तर ते घर गावकीच्या नावावर करण्याची मागणी केली. हे अमान्य केल्याने तिला गावाबाहेर काढल्याचे रसिकाने अर्जात म्हटले आहे. तिच्या दिरानेही आश्रय देऊ नये म्हणून दबाव टाकला. मुंबई येथे झालेल्या गावकीच्या बैठकीसाठी रात्री उशीरापर्यंत थांबवून ठेवण्यात आले होते. अन्यायाबाबत पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गावपंचांना ठाण्यात बोलावण्यात आले. वाळीतची बंदी उठवून त्रास देणार नाही असे लेखी देण्याचे गावपंचांनी मान्य केले तरी त्यांनी आपला शब्दही फिरवला. त्यामुळे सघ्या ती तणावात आहे. (प्रतिनिधी)